02 January, 2025
बालविवाह निर्मूलनासाठी ग्रामस्तरावर चळवळ उभी करावी - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 02 : बालविवाहाला आळा घालण्यासाठी सर्व विभागाच्या माध्यमातून बालविवाह निर्मुलन चळवळ उभी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आयोजित आढावा बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा त्रैमासिक कामकाज आढावा, प्रायोजकत्व व प्रतिपालकत्व मंजुरी समिती, बालविवाह निर्मूलन, बाल कल्याण समिती, जिल्हा कृती दल बैठक (कोव्हिड-19), मादक द्रव्यांचे सेवन प्रतिबंधक समिती, चाईल्ड हेल्पलाईन व वन स्टॉप सेंटर इत्यादी बाबींची कामकाज आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) गणेश वाघ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजपाल कोल्हे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत डिग्रसकर, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी विलास जगताप, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पचायत यांचे प्रतिनिधी व्ही. एस. भोजे, समाज कल्याण विभागाचे आ. ना. वागतकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ.बालाजी भाकरे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. जी. कऱ्हाळे, पोलीस निरीक्षक दिलीप मोरे, बाल न्याय मंडळ सदस्य सत्यशिला तांगडे, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे के. पी. शिंदे, एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन हाटकर, युनिसेफ SBC3 चे टिम हेड नंदु जाधव, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा संरक्षण अधिकारी माया सुर्यवंशी, विधी सल्लागार विद्या नागशेट्टीवार, परिवीक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले, बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, समुपदेशक सचिन पठाडे, क्षेत्रीय कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत, सखी वन स्टॉप सेंटरचे केंद्र समन्वयक शीला रणवीर, समुपदेशक दिनेश पाटील, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक संदीप कोल्हे, सुरज इंगळे, तथागत इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. गोयल म्हणाले, बाल विवाह निर्मूलनासाठी युनिसेफ SBC3 यांच्यामार्फत निवडण्यात आलेल्या 50 गावांमधील ग्राम बाल संरक्षण समितीच्या सदस्यांना जिल्हास्तरावर बालविवाह निर्मूलन विषयक प्रशिक्षण द्यावेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गावात एक चॅम्पीयन देऊन सर्व विभागाच्या माध्यमातून बालविवाह निर्मूलन चळवळ उभी करावी. गावस्तरावर होत असलेल्या बालविवाह प्रकरणात गावातील प्रशासकीय यंत्रणामध्ये शाळा, अंगणवाडी, आरोग्य विभाग व पंचायत विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी बालविवाह निर्मूलन कसे करता येईल व किशोरवयीन मुलींचे शाळेतील प्रमाण वाढविण्यासाठी, स्थलांतरीत कुटूंबातील मुलींच्या नोंदी ठेवणे व भेटी देणे. तसेच 15 दिवसापेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर असलेल्या कुटूंबातील मुलींच्या घरी भेटी देऊन त्यांच्या पालकाकडून हमीपत्र लिहून घ्यावे, अशा सूचना दिल्या .
तसेच याप्रसंगी बाल संगोपन योजनेसाठी आलेल्या लाभार्थ्यांचे सामाजिक तपासणी अहवाल, जिल्हा कृती दल, चाईल्ड हेल्पलाईन CHL (1098) कामकाज व वन स्टॉप सेंटर कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाने राबविलेले विविध जनजागृती कार्यक्रम, बाल हक्क सप्ताह, आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालविवाह मुक्त भारत मोहीम, तसेच जिल्ह्यातील कार्यरत स्वंयसेवी संस्थेमध्ये वीर बाल दिवस व वैयक्तीक स्वच्छतेचे सत्र व मनोरंजनात्मक घेण्यात आलेले खेळ, कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी, मिशन वात्सल्य पोर्टल, NCPCR पोर्टल, घर पोर्टल, PM Care पोर्टल, गती शक्ती पोर्टल व Caring पोर्टल या सर्व पोर्टलवरती भरण्यात येणाऱ्या माहिती, प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व योजना, जिल्ह्यातील बाल विवाह समूळ नष्ट करण्यासंदर्भात आखलेल्या नवीन योजनांची माहिती दिली. तसेच या बैठकीत बालकांना प्रायोजकत्व योजनेचा लाभ देण्याबाबत मंजुरी देण्यात आली.
*******
No comments:
Post a Comment