27 January, 2025
बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक गैरसमज पसरवू नये
हिंगोली (जिमाका), दि. 27 : राज्यात रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात, ठाणे जिल्ह्यातील कोपरी या गावातील पक्षांमध्ये व लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी कावळ्यामध्ये झालेली मरतूक ही एव्हीएन इन्फल्यूएन्झा (बर्ड फ्लू) H5N1 या आजाराने झाल्याचे निदान राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, भोपाळ यांनी कळविले आहे. या आजाराचा राज्यातील इतर भागात फैलाव होण्याची तसेच बाजारामध्ये अंडी, चिकन विक्रीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. पक्षाची मरतूक आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांक 18002330418 / 1962 वर त्वरित संपर्क करावा. तसेच बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक गैरसमज व अफवा पसरवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment