11 April, 2025
गुंतवणूकदारांच्या संमेलनात केले नव उद्योजकांना मार्गदर्शन
• गुंतवणूक परिषदेमध्ये हिंगोली जिल्ह्यात 205 उद्योजक करणार सामंजस्य करार
हिंगोली, दि.11 (जिमाका): उद्योग विभाग, उद्योग संचालनालय, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत हिंगोली जिल्ह्यांतर्गत नवीन गुंतवणूकदारांचे संमेलन नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर विभागाचे उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते हे होते. यावेळी नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कदम, हिंगोली जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण मोरे उपस्थित होते.
यावेळी उद्योग सहसंचालक श्री. यशवंते यांनी या गुंतवणूक परिषदेमध्ये हिंगोली जिल्ह्यात 205 उद्योजकांनी 738 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे, असे सांगून गुंतवणूक संमेलनाची सविस्तर माहिती दिली.
मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी सागर आवटे यांनी शासनाकडून उद्योजकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या परवान्याबाबत अंमलात आलेल्या नवीन कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सीडबीच्या अधिकारी श्रीमती बलखंडे यांनी सीडबीच्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली.
मिटकॉन हिंगोलीचे प्रकल्प अधिकारी सुभाष जाधव, खादी ग्रामोद्योग अधिकारी श्री. वाघमारे, अधीक्षक पी. व्ही मेंढे, उद्योग निरीक्षक सुदेशना सवराते, एल. एस. दिपके, सय्यद युनूस, दत्ता उचितकर, सुभाष बोरकर, विकास उंडाळ, किशन धाबे यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय निलावार यांनी केले तर प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी आभार मानले.
******
No comments:
Post a Comment