23 April, 2025

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'ॲग्री स्टॅक' प्रणालीत तात्काळ नोंदणी करावी -जिल्हाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 23 : महाराष्ट्र शासनाने दि. 11 एप्रिल 2025 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 'अँग्री स्टॅक' प्रणालीत नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाच्या कृषी योजना, अनुदाने आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करणे अत्यावश्यक आहे. ॲग्री स्टॅक प्रणालीवर नोंदणी करुन फार्मर आयडी काढून घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्यामुळे ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. नोंदणी प्रक्रियेमध्ये तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांची मदत उपलब्ध असून, हे कर्मचारी शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य करतील. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रावर जाऊन अँग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी आणि फार्मर आयडी काढून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment