26 May, 2025

प्रमाणित बियाणे वितरण या बाबीसाठी शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 26 : खरीप हंगामासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अणि पोषण अभियान कडधान्य व पौष्टिक तृणधान्य तसेच राष्ट्रीय खाद्यतेल-तेलबिया अभियान राबविण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2025-26 मध्ये कार्यक्रमाची अंमलबजाणी करावयाची आहे. त्यानुषंगाने कृषी विभागाकडून चालू खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. या बियाणे वितरण कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत तूर, मूग, उडीद या पिकांसाठी 50 टक्के व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत सोयाबीन पिकांसाठी 100 टक्के अनुदान देय आहे. तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर पोर्टलवर निवड करुन आपणास संदेश येईल. या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *******

No comments:

Post a Comment