हिंगोली (जिमाका), दि. 24 : दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने आज हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळेतील 6 वी ते 10 वीच्या सर्व विद्यार्थिनींनी आपल्या आई-वडिलांना भावनिक पत्र लिखाणाचा उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पत्र लिखाण उपक्रम राबविण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळातील विद्यार्थिनींनी ‘माझ लग्न वय होण्याआधी, शिक्षण पूर्ण होण्याआधी करु नका, मला शिक्षण घेऊ द्या’ असे भावनिक पत्र आपल्या आई-वडिलांना लिहिले आहे.
*****
No comments:
Post a Comment