हिंगोली (जिमाका), दि. 27 : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद हिंगोलीच्या शिक्षण विभागामार्फत संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर भव्य प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यातील विविध शाळांमधील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्याला पालकमंत्री नरहरी झिरवाळ, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
शिक्षण विभागातर्फे तयार करण्यात आलेले विद्यार्थ्यांचे संचलन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. तिरंगी झेंड्याच्या सन्मानात २०० विद्यार्थ्यांनी नामदेव परेड ग्राउंडवर तालासुरात कवायती सादर केल्या. "भारत माता की जय" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
शिक्षण विभागाच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आसावरी काळे, गटशिक्षणाधिकारी दत्तराव नांदे तसेच संतोष बांगर, श्री. व्यवहारे, श्री. रिझवान, श्री. सुधाकर गावंडे, विजय बांगर या सर्वांनी विशेष प्रयत्न केले.
प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा शिस्त आणि देशप्रेमाच्या भावनेने संपन्न झाला, ज्याचे कौतुक जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
******


No comments:
Post a Comment