26 November, 2024
बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 26 : केंद्रीय महिला व बालविकास मंत्री यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात उद्या दि. 27 नोव्हेंबर, 2024 रोजी बालविवाह मुक्त भारत मोहिमेचा शुभांरभ होणार आहे. या अनुषंगाने भारत सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशात ही मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याविषयी निर्देशित केले आहे. त्यानुसार राज्यभरात जिल्ह्यातील सर्व विभाग व प्रत्येक गावात उद्या, दि. 27 नोव्हेंबर, 2024 रोजी शपथ/प्रतिज्ञा घेण्यात यावी व यथावकाश देण्यात येणाऱ्या लिंकवर सहभाग होईल, असे निर्देश शासन स्तरावरुन देण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत, निवडून आलेले प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, आरोग्य क्षेत्रातील एएनएम, आशा, पीएचसी, सीएचसी, विधी सेवा प्राधिकरण-एसएलएसए, डीएलएसए, गृह विभागांतर्गत सर्व पोलीस स्टेशन, एडब्ल्यूडब्ल्यू, एसआरएलएम आणि एसएचजी यासह सर्व यंत्रणांनी बाल विवाह प्रतिबंधासाठी प्रतिज्ञा घ्यावी. त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment