04 June, 2025
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक
हिंगोली (जिमाका), दि. 04 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग व आंबिया बहारामध्ये अधिसूचित फळपिकांसाठी सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी हिंगोली जिल्ह्यात राबविण्यास दि. 12 जून, 2024 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
तसेच दि. 11 एप्रिल, 2025 च्या शासन निर्णयानुसार दि. 15 एप्रिल, 2025 पासून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आला आहे.
त्यामुळे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग व आंबिया बहार सन 2025-26 मध्ये योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक राहील, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment