05 June, 2025

शेतकऱ्यांनो, विना परवाना बियाणे खरेदी करु नका

हिंगोली (जिमाका), दि. 05 : कापूस बियाणे बाजूच्या राज्यामधून तसेच बाजूच्या जिल्ह्यामधून पक्की पावती नसलेले कोणतेही बियाणे खरेदी करु नये. विशेषत: त्यामध्ये एचटीबीटी कापूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे अवैधरित्या बियाणे खरेदी झाल्यास बियाणे अधिनियम 1966 नुसार कारवाई होऊ शकते. तसेच अवैधरित्या बिना पावतीचे बियाणे खरेदी केल्यास उगवण शक्ती कमी निघाल्यास, बियाण्याची शुध्दता इत्यादी तक्रारीची दखल नियमानुसार घेता येत नाही आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. कापूस व इतर पिकांचे बियाणे जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांनी परवानाधारक विक्रेत्याकडूनच रितसर पक्की पावती घेऊन बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. *****

No comments: