हिंगोली (जिमाका), दि. 03 : शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागामार्फत जिल्ह्यात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे, खते व कीडनाशके खरेदी करण्यास सुरुवात केली असून कृषी निविष्ठांच्या विक्रीत कोणत्याही प्रकारचे लिंकिंग होऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील कृषी निविष्ठा वितरकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन खतासोबत इतर कोणत्याही उत्पादनांची किंवा निविष्ठांची सक्तीने विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनी देखील खते, बियाणे किंवा इतर निविष्ठा खरेदी करताना आपल्या मागणीनुसारच साहित्य घ्यावे. विक्रेत्यांकडून बळजबरीने इतर उत्पादने देण्याचा प्रयत्न होत असल्यास त्यास ठामपणे नकार द्यावा, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
अशा प्रकारची घटना निदर्शनास आल्यास संबंधित तालुक्यातील गुणनियंत्रण निरीक्षकांशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. हिंगोली तालुक्यासाठी प्रविण मनवर (मो. 7588502060) व पंकज राठोड (मो. 9422815152), कळमनुरी तालुक्यासाठी समीर वाळके (मो. 7841882969) व रामेश्वर गवळी (मो. 7038847393), वसमत तालुक्यासाठी केशव भुक्तरे (मो. 7588522845) व रामेश्वर गवळी (मो. 7038847393), सेनगाव तालुक्यासाठी देवेंद्र देशमुख (मो. 9423129188) व पंकज राठोड (मो. 9422815152), तसेच औंढा नागनाथ तालुक्यासाठी किशोर शेळके (मो. 7798465075) व सुभाष पाचपुते (मो. 8850178461) यांच्याशी संपर्क साधता येईल.
याशिवाय कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 तसेच 8275487400 या क्रमांकांवरही तक्रार नोंदविता येणार आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या लिंकिंगला बळी न पडता आपल्या हक्काची निविष्ठा मागणीप्रमाणेच खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment