.
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
30 August, 2026
खेळाडूंनी हिंगोली जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हळद संशोधन केंद्राची बोधचिन्ह स्पर्धा
28 August, 2026
तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार
महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ‘महाआयडी’ तयार करावा
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन
हिंगोली, दि. २८ ऑगस्ट:- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदी योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी अर्ज भरताना आवश्यक बाबींची पूर्तता करून महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ‘महाआयडी’ तयार करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
महाडीबीटी 2.0 वर नोंदणी करून अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नवीन ‘महाआयडी’ तयार करणे आवश्यक आहे. मागील पोर्टलवरील जुना आयडी किंवा पासवर्ड यापुढे आवश्यक राहणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या आधार क्रमांकाचा वापर करून नवीन महाआयडी तयार करावा. आधार पोर्टलवरील विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे.
नवीन अर्ज तसेच नूतनीकरण अशा दोन्ही प्रकारच्या अर्जांसाठी नवीन महाआयडी व आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यानंतर ‘माझा अर्ज नूतनीकरण करायचा’ हा पर्याय निवडावा. अर्ज भरताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्पष्ट पीडीएफ स्वरूपात अपलोड करावीत.
प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचे आवाहन
शैक्षणिक वर्ष 2025-26 व त्यापूर्वीच्या वर्षातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क (फ्रीशिप) प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदी योजनांचे अर्ज वारंवार सूचना देऊनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची तपासणी करून त्यामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्या तात्काळ दूर कराव्यात. परिपूर्ण अर्ज 30 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्जांची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी दोन दिवसांत परिपूर्ण अर्ज महाविद्यालयास सादर करावा. अन्यथा शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी व त्यांच्या पालकांची राहील.
सर्व महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जांची विहित कालावधीत अथवा त्यापूर्वी प्राधान्याने कार्यवाही करून प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, असेही सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी आवाहन केले आहे.
27 August, 2026
औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आयुष्मान कार्डसाठी स्वतंत्र कक्ष
योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा. -खासदार नागेश पाटील आष्टीकर
विविध विकास कामांचा 'दिशा समिती'कडून सर्वंकष आढावा
हिंगोली, दि. २७ (जिमाका) : जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने प्रभावीपणे काम करावे. सर्व योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले. जिल्ह्यातील विविध विकास योजना व कामांचा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी समितीचे सहअध्यक्ष खासदार रामराव वडकुते, आमदार राजू नवघरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, दिशा समितीचे सदस्य संदीप ससे, दयानंद पतंगे, श्रीमती शारदा पोपळघाट, श्रीमती शशिकला भवर, भास्कर घोडके, श्रीमती अश्विनी इंगोले पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मागील बैठकीतील निर्णयांवर झालेल्या कार्यवाहीचा तसेच प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला. विविध विकास योजनांची सद्यस्थिती, उद्दिष्टपूर्ती, पूर्ण व अपूर्ण कामे आणि प्रलंबित कामांची कारणे याबाबत विभागनिहाय माहिती घेण्यात आली.
महावितरण, कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग आणि जलजीवन मिशनसह विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, जलजीवन मिशन, भारतनेट, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत मिशन, समाजकल्याण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, आरोग्य आणि शिक्षण विभागातील योजनांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.
विविध योजनांबाबत बैठकीसाठी परिपूर्ण आणि अचूक माहिती सादर करावी. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेला प्राधान्य द्यावे. अपूर्ण माहिती सादर झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार रामराव वडकुते यांनी दिला.
*मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे*
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उपलब्धता सुनिश्चित करावी. तसेच शाळांमध्ये सौर पॅनल उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार आष्टीकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या.
*आयुष्मान भारत कार्ड वाटपाला गती*
आयुष्मान भारत कार्ड पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. सामान्य नागरिकांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे खासदार आष्टीकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील विकास योजनांची उद्दिष्टपूर्ती, प्रलंबित कामांना गती आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध आणि समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
******
.jpeg)
.jpeg)



