23 March, 2026

सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय  विभागाच्या  विविध कल्याणकारी  योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती  व जनजागृती होण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

हिंगोली  जिल्ह्यातील बोरखेडी, आंबा, पांगरा सती, खांडेगाव, आखाडा बाळापूर,  शेवाळा, कुर्तडी, देवजना, कळमकोंडा, सुकळी  खु. आदी  गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली  जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

******   







संगणक टंकलेखक बेसिक कोर्स लघुलेखन परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी 30 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : शासकीय संगणक टंकलेखक  बेसिक कोर्स लघुलेखन परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी  पात्र विद्यार्थ्यांनी अमृत संस्थेच्या https://mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर दि. 30 एप्रिल, 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स लघुलेखन परीक्षा दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येते. माहे जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक 10 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील अमृताच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, आयगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराती, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानडी इ.) विद्यार्थ्यांना परीक्षाशुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

यासाठी अर्जासोबत  सन 2025-26 किंवा सन 2026-27 या आर्थिक वर्षातील उत्पन्न प्रमाणपत्र अथवा इडब्‌ल्यूएस प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, लक्षित गटातील जात नमूद असलेला शासकीय पुरावा (उदा. टी.सी./एल.सी./शालेय निर्गम उतारा), माहे जानेवारी 2026 परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, बँक खाते तपशीलासाठी पासबुकची प्रत किंवा रद्द केलेला धनादेश आदी कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

******

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 




हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शहीद दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त  शहीद  भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.    

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य), अनिल माचेवाड, मनकर्णा जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  

*****

22 March, 2026

सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती


 


हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय  विभागाच्या  विविध कल्याणकारी  योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती  व जनजागृती होण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली  जिल्ह्यातील आजेगाव, सिंदफळ, थोरवा, हयातनगर, रिधोरा, हट्टा, आरळ, साखरा, बालेगाव, हिवरखेडा आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

******






21 March, 2026

सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती

 


हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय  विभागाच्या  विविध कल्याणकारी  योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती  व जनजागृती होण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

हिंगोली  जिल्ह्यातील केळी, रुपूर, सिद्धेश्वर, जडगाव, पिंपळदरी, सुकळी, पारडी खुर्द, कुरुंदा, सोमठाना, किन्होळा आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

******






20 March, 2026

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर; माहिती भरण्यास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ




हिंगोली (जिमाका), दि. 20 : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025” चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन दि. 03 व 04 फेब्रुवारी 2026 रोजी  तीन  सत्रांमध्ये करण्यात आले होते.

  या परीक्षेस एकूण 46 हजार 68 परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यापैकी 38 हजार 559 परीक्षार्थी प्रत्यक्ष परीक्षेस उपस्थित होते.

या परीक्षेचा निकाल दि. 13 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in⁠ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा किंवा सीटीईटी उत्तीर्ण असल्यास त्याबाबतची माहिती https://mscepune.in/dredola/KP२०२६Info.aspx⁠ या लिंकवर भरण्यासाठी यापूर्वी दि. 16 ते 21 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

मात्र, उमेदवारांकडून  प्राप्त झालेल्या विनंत्या लक्षात घेता सदर माहिती भरण्याची मुदत वाढवून आता दि. 22 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 पर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

*******

हुतात्मा दिनानिमित्त ‘माय भारत’ तर्फे देशभरात पदयात्रांचे आयोजन, युवकांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 20: हुतात्मा दिनाचे औचित्य साधून ‘माय भारत’ संस्थेतर्फे देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘हुतात्मा दिवस पदयात्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव या  स्वातंत्र्यसैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे.

'माझा भारत, माझी जबाबदारी' या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये राष्ट्रनिर्मितीची भावना जागृत करणे, तसेच नागरी जबाबदारी आणि सामुदायिक विकासासाठी त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा आहे.

या पदयात्रेत प्रत्येक जिल्ह्यात किमान 500 युवा स्वयंसेवकांचा सहभाग अपेक्षित असून, युवक एकता, शिस्त आणि देशभक्तीचा संदेश देतील. पदयात्रेपूर्वी 19 मार्चपासून ‘माय भारत’ पोर्टलवर ‘अनसंग हिरोज’ या विषयावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा आणि एक युवा ऐसा भी या विषयावर रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

22 मार्च रोजी स्वच्छता मोहीम व रस्ते सुरक्षा जनजागृती यांसारख्या उपक्रमांद्वारे ‘सिव्हीक सेन्स चँलेंज’ राबविण्यात येत आहे. पदयात्रेची सुरुवात हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून व त्यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या अभिवादन सभेने होणार आहे.

ही पदयात्रा अंदाजे 2 ते 4 किलोमीटर अंतराची असून शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात येईल. सहभागी युवक हातात तिरंगा, डोक्यावर टोपी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी युवक तसेच स्वातंत्र्याचा आदर करा, जबाबदारीने वागा अशा संदेशांचे फलक घेऊन सहभागी होतील.

या उपक्रमाच्या माध्यमातून युवाशक्तीला विधायक कार्यासाठी संघटित करणे, तसेच समाजात शिस्त व नागरी जाणीव निर्माण करणे हा उद्देश आहे. नागरिक, शैक्षणिक संस्था व विविध युवा संघटनांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

******