17 June, 2026

महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



हिंगोली (जिमाका), दि. 17 : महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सामान्य अनिल माचेवाड यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी नायब तहसीलदार सचिन जोशी, सी. आर. गोळेगावकर, संतोष बोथीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


 ******

‘एल निनो’च्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाला प्राधान्य द्यावे

  

·         पोषक चारा पिकांची लागवड, मुरघास निर्मिती व चारा साठवणुकीचे आवाहन; पशुवैद्यकीय सेवांसाठी 1962 हेल्पलाईन उपलब्ध

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

‘एल निनो’मुळे उद्भवू शकणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी पशुपालकांनी पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करावी. गाई-म्हशींचे आरोग्य आणि दूध उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी अशा पिकांची लागवड करणे आवश्यक आहे, ज्यातून मुख्य पीक उत्पादनाबरोबरच दर्जेदार चाऱ्याचीही उपलब्धता होईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरील किंवा पडीक जमिनीवरील नैसर्गिक गवताचे संवर्धन करून त्याचा योग्य वापर करावा. पावसाची कमतरता किंवा चारा टंचाईच्या काळात हेच गवत जनावरांसाठी महत्त्वाचे खाद्यस्रोत ठरू शकते. त्यामुळे उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्पादित अतिरिक्त चारा ‘मुरघास’ (सायलेज) किंवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवण्याचा सल्लाही पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. खरीप व रब्बी हंगामातील चारा पिकांचे सायलेज तंत्रज्ञानाद्वारे जतन केल्यास फेब्रुवारी ते जून २०२७ या संभाव्य टंचाईच्या कालावधीत जनावरांच्या खाद्याची गरज भागविणे शक्य होणार आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांबाबत पशुपालक व शेतकरी बांधवांना विविध माध्यमांतून मार्गदर्शन करण्यात येत असून, पशुधनाच्या आरोग्य संरक्षणासाठी विभाग सज्ज असल्याचेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

पशुपालकांनी कोणत्याही प्रकारच्या शंका किंवा अडचणींसाठी पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ या कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक माहिती तसेच पशुवैद्यकीय सेवा प्राप्त कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड आणि उपलब्ध चाऱ्याची प्रभावी साठवणूक यामुळे पशुधनाचे पोषण आणि पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी या आवाहनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

******

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 18 जून रोजी मतदान; मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत

 


 

 

हिंगोली, दि. 17 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषद परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणुकीसाठी मतदान गुरुवार, दि. 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे.

मतदानासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

तहसीलदार कार्यालय, परभणी येथे जिल्हा परिषद परभणी (सर्व पंचायत समिती सभापतींसह) व  शहर महानगरपालिकेच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 128 मतदार मतदान करणार आहेत.

तहसीलदार कार्यालय, सेलू येथे नगर परिषद सेलू व नगर परिषद जिंतूरच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे 59 मतदार मतदान करतील.

उपविभागीय अधिकारी कार्यालय, तळ मजला, संजय गांधी विभाग, गंगाखेड येथे नगर परिषद गंगाखेड, नगर पंचायत पालम आणि नगर परिषद पूर्णा येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 73 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

तहसीलदार कार्यालय, पाथरी येथे नगर परिषद पाथरी, नगर परिषद मानवत आणि नगर परिषद सोनपेठ येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे 74 मतदार मतदान करतील.

तहसीलदार कार्यालय, हिंगोली येथे नगर परिषद हिंगोली व नगर पंचायत सेनगावच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 58 मतदार आहेत.

तहसीलदार कार्यालय, कळमनुरी येथे नगर परिषद येथे 23 मतदार मतदान करतील. तर तहसीलदार कार्यालय, वसमत येथे नगर परिषद वसमत व नगर पंचायत औंढा नागनाथच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 51 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सदर निवडणुकीमध्ये एकूण 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी  253 स्त्री मतदार तर 213 पुरुष मतदार आहेत. या मतदारांमध्ये जिल्हा परिषद परभणीचे सर्व सदस्य,  जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती,  शहर महानगरपालिकेचे सर्व सदस्य तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतांचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा समावेश आहे.

दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी दि. 22 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, येथील तळमजल्यावरील हॉल क्रमांक १ मध्ये होणार आहे.

*****

जिल्ह्यात 'नशामुक्त सप्ताहा'स आजपासून सुरुवात * व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृती अभियान

 



हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात 17 ते 26 जून या कालावधीत ‘नशा मुक्त अभियान, विकसित भारत की पहचान’ या संकल्पनेवर आधारित नशा मुक्त सप्ताहास आज प्रारंभ झाला.

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली  आणि स्व. कलावतीबाई देशमुख बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे, विशेष अधिकारी अमोल घुगे, जिल्हा सल्लागार डॉ. किरण लोंढे, मानसशास्त्रज्ञ कुलदीप केळकर व आनंद साळवे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. समाज कल्याण विभागामार्फत उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुलदीप केळकर यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गुठ्ठे यांनी युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. सुधीर ठोंबरे यांनी व्यसनमुक्तीचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत व्यसनाधिनतेपासून दूर राहण्याचा संदेश दिला. तसेच उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरेश पठाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजयानंद पकाने, माधव सोनुले, चेतन कामखेडे, चंद्रमुनी नरवाडे, राहुल कांबळे, सुनील अंभोरे, श्रीमती जयश्री शिंदे तसेच समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हिंगोली  जिल्ह्यात नशा मुक्त सप्ताहाच्या निमित्ताने विविध जनजागृती उपक्रम, शपथविधी, मार्गदर्शन सत्रे आणि सोशल मीडियाद्वारे व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागामार्फत देण्यात आली.

*****

माविमच्या वार्षिक क्रेडिट प्लॅन कार्यशाळेत २५ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट जाहीर


बचत गटांची ९९.८ टक्के कर्जपरतफेड; महिलांनी शाश्वत उपजीविकेसाठी उद्योजकतेकडे वळावे – मान्यवरांचे आवाहन






हिंगोली(जिमाका), दि. १६ : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने जिल्हास्तरीय वार्षिक क्रेडिट प्लॅन (२०२६-२७) कार्यशाळा हॉटेल शिवलीला पॅलेस येथे उत्साहात पार पडली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यशाळेत नवतेजस्विनी व अल्पसंख्याक प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहायता महिला बचत गटांसाठी तसेच वैयक्तिक कर्ज योजनांसंदर्भातील क्रेडिट प्लॅनचे सादरीकरण करण्यात आले. मागील वर्षातील योजना व बँकनिहाय प्रगतीचा आढावा घेऊन चालू आर्थिक वर्षासाठीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी जिल्ह्यातील ५२० स्वयं सहायता महिला बचत गटांना २५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती दिली. तसेच १२५ महिलांना ६५ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बचत गटांचा कर्जपरतफेडीचा दर ९९.८ टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमरावती विभागाचे विभागीय सल्लागार केशव पवार यांनी राज्यस्तरीय कामकाजाचा आढावा घेतला, तर विभागीय व्यवसाय विकास सल्लागार पवन देशमुख यांनी वैयक्तिक कर्ज योजनांबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुजीत झोडगे यांनी माविमच्या बचत गटांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे सांगितले. नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक अविनाश लहाने यांनी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय उभारून शाश्वत उपजीविका विकसित करावी, असे आवाहन केले. आयसीआयसीआय बँकेचे प्रतिनिधी लोंढे यांनी बँकेला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

कार्यशाळेत विविध बँका, महामंडळे आणि शासकीय विभागांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. कृती संगम उपक्रमाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी समन्वय वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. बँकांनी अधिकाधिक कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करत माविमच्या महिला बचत गटांना आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब झिंजाडे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन मुकुंद जहागीरदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रकल्प सल्लागार गजानन खिरोडकर, एमआयएस सल्लागार गजानन इंगळे, संतोष ठाकूर तसेच विविध सीएमआरसी व्यवस्थापकांनी योगदान दिले.

मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे आणि विविध संस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

***

16 June, 2026

अॅग्रीस्टॅक नोंदणीसाठी १७ व १८ जून रोजी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखांमध्ये विशेष शिबिरे



हिंगोली(जिमाका), दि. १६ : "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" अंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांची अॅग्रीस्टॅक (Agristack) आधार मंचावर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या अनुषंगाने अॅग्रीस्टॅक मंचावर नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय व शाखानिहाय यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीतील शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी संबंधित शाखास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून सर्व पात्र शेतकऱ्यांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अॅग्रीस्टॅक मंचावर नोंदणी नसल्यास संबंधित शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नसून त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अॅग्रीस्टॅक नोंदणीसाठी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये दि. १७ व १८ जून २०२६ रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

वसमत तालुक्यातील आरळ, वसमत, चोंडी आंबा, गिरगाव, कुरुंदा व पूर्णा एसएसके शाखांमध्ये, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, कळमनुरी, पोतरा व वारंगा फाटा शाखांमध्ये, सेनगाव तालुक्यातील आजेगाव, गोरेगाव, केंन्द्रा बुद्रुक, पानकनेरगाव, साखरा व सेनगाव शाखांमध्ये, हिंगोली तालुक्यातील हिंगोली, खानापूर चित्ता, फाळेगाव, नरसी सिरसम बु. शाखांमध्ये तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ, जवळा बाजार, लाख, शिरड शहापूर व येहळेगाव सोळंके शाखांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा उपनिबंधक श्रीमती सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

********

पी.एम. किसान योजनेच्या २३ व्या हप्त्याचे शनिवारी वितरण

 


* 'पी.एम. किसान उत्सव दिवस' निमित्त राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ

हिंगोली, दि.१६ (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीसाठीचा २३ वा हप्ता शनिवार, (दि.२०) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात येणार आहे. या निमित्ताने केंद्र शासनाने दि. २० जून हा दिवस देशभर ‘पी.एम. किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक आधार उपलब्ध करून देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाकाठी तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये, असे एकूण सहा हजार रुपये थेट आधार-संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येतात.

राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी २२ हप्त्यांद्वारे सुमारे ४१ हजार ८३ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. यंदाच्या २३ व्या हप्त्याअंतर्गत भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या राज्यातील सुमारे ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना अंदाजे १,८१७ कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे मिळणार आहे.

पी.एम. किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका कृषी कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघटना तसेच प्राथमिक कृषी पतसंस्था येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रांवरूनही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

कृषी, महसूल व वन तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा उत्सव साजरा करण्यात येणार असून, केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in⁠ या संकेतस्थळावरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

*******

शासकीय कार्यालयांतील तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्यांवर कारवाई

 


* १४ जणांकडून २७०० रुपयांचा दंड वसूल



हिंगोली(जिमाका), दि. १६ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्या जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत विशेष दंडात्मक कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आज मंगळवारी (दि. १६ जून) जिल्हा कचेरी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात करण्यात आलेल्या तपासणीत तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या तसेच तंबाखूयुक्त पदार्थ जवळ बाळगणाऱ्या १४ जणांवर कारवाई करण्यात आली.

अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत कोटपा-२००३ (COTPA) कायद्याच्या कलम ४ चे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. कारवाईदरम्यान १४ व्यक्तींकडून एकूण २ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा कचेरीतील १२ तर सार्वजनिक बांधकाम विभागातील २ कर्मचारी व इतर व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाभरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत असून ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने सर्व शासकीय कर्मचारी तसेच विविध कामांसाठी शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कर्तव्यावर असताना अथवा कार्यालयीन परिसरात तंबाखू, गुटखा किंवा अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये तसेच असे पदार्थ सोबत बाळगू नयेत, असे आवाहन केले आहे.

ही कारवाई जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी मानसशास्त्रज्ञ कुलदीप केळकर आणि मेडिकल सोशल वर्कर आनंद साळवे यांनीही मोहिमेत सहभाग घेतला. प्रशासनाने तंबाखूमुक्त कार्यालयीन वातावरण निर्मितीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

***

विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षणाची कामे कालमर्यादेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 







हिंगोली(जिमाका), दि. 16 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करून हिंगोली जिल्ह्याचा राज्यातील अग्रक्रम कायम राखावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करत होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, समाधान घुटुकडे, प्रतिक्षा भुते, उपजिल्हाधिकारी राजेश सरवदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, केशव गड्डापोड यांच्यासह जिल्हास्तरीय नोडल अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, पूर्व विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच धर्तीवर सध्याच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची कामेही गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे योग्य नियोजन करावे. यासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर यांनी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेची माहिती देताना सांगितले की, मतदार यादीची अचूकता, सुसंगतता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी मतदार केंद्रांचे मॅपिंग, ब्लर फोटो हटविणे आणि विविध तांत्रिक पडताळण्या करण्यात येणार आहेत. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण व पूर्वतयारी, घरोघरी पडताळणी मोहीम, मसुदा मतदार यादी प्रसिद्धी, दावे व हरकती स्वीकारणे, नोटीस वाटप, दावे-हरकतींचा निपटारा आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्धी अशी सहा टप्प्यांतील कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रगणक (इन्युमरेशन) अर्जाचे शंभर टक्के वितरण करण्याची जबाबदारी पार पाडावी. हे वितरण पाच दिवसांत पूर्ण करून त्यानंतर त्याचे संकलन, नागरिकांना मार्गदर्शन आणि माहितीचे अचूक डिजिटायझेशन करून वेळेत अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अनुपस्थित, स्थलांतरित आणि मृत मतदार तसेच अर्ज सादर न करणाऱ्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार करून आवश्यक कार्यवाही करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या घरोघरी पडताळणी मोहिमेची माहिती देत प्रगणक अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि त्याची अंमलबजावणी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

दरम्यान, पूर्व विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मतदार नोंदणी अधिकारी प्रतिक्षा भुते, समाधान घुटुकडे आणि विकास माने यांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

प्रशिक्षण कार्यक्रमात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

******

15 June, 2026

अमृतच्या पाच दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. १५ : समाजातील सर्व घटकांची उन्नती करणे हे शासनाचे कर्तव्य असून कोणताही वर्ग विकासापासून वंचित राहिल्यास संपूर्ण समाज दुर्बल होतो. समाजाच्या उन्नतीबरोबरच चारित्र्यनिर्माणालाही तितकेच महत्त्व आहे. व्यक्तीनिर्माणातून चारित्र्यनिर्माण आणि त्यातून राष्ट्रनिर्मिती घडते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पाच दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतातील प्रत्येक नागरिक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेने कार्य करताना स्वदेशी, स्वभाषा, संस्कृती आणि बचत या मूल्यांचा अंगीकार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमृतचे प्रतिनिधी म्हणून कर्मचारी नव्हे तर कार्यकर्ता या भावनेतून काम केल्यास व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्मितीचे ध्येय साध्य होईल, असे सांगून कामातून माणसे जोडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच प्रत्येकाने आपल्या कार्याची गुणवत्ता आणि व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रास्ताविकात संस्थेची स्थापना, आतापर्यंतचा संघर्षमय प्रवास आणि प्रगतीचा आढावा घेतला. राज्यभरातील अनेक संस्थांकडून अमृतच्या कार्याची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रशिक्षण शिबिरांमधून नवीन कौशल्ये, उपक्रम आणि कल्पना आत्मसात करून अधिक जबाबदारीने व कार्यक्षमतेने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने झाली. औंध येथील अमृतच्या मुख्यालयात आयोजित या निवासी प्रशिक्षण शिबिरात राज्यातील विविध जिल्ह्यांतील अमृत व्यवस्थापक, अमृत मित्र आणि अमृत सखी सहभागी झाले आहेत. हे शिबिर दि. १४ जून ते १८ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

*******

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान; ४६६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 


हिंगोली, दि. १५ (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषद परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतदानासाठी हिंगोली व परभणी जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.


मतदान दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे.


सदर निवडणुकीमध्ये एकूण ४६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी २५३ स्त्री मतदार तर २१३ पुरुष मतदार आहेत. या मतदारांमध्ये जिल्हा परिषद परभणीचे सर्व सदस्य,  जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती, शहर महानगरपालिकेचे सर्व सदस्य तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतांचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा समावेश आहे.


मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 


तहसीलदार कार्यालय, हिंगोली येथे नगर परिषद हिंगोली व नगर पंचायत सेनगावच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ५८ मतदार आहेत. 


तहसीलदार कार्यालय, कळमनुरी येथे नगर परिषद येथे २३ मतदार मतदान करतील. तर तहसीलदार कार्यालय, वसमत येथे नगर परिषद वसमत व नगर पंचायत औंढा नागनाथच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

तर परभणी जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालय, परभणी येथे जिल्हा परिषद परभणी (सर्व पंचायत समिती सभापतींसह) व  शहर महानगरपालिकेच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे १२८ मतदार मतदान करणार आहेत. 


तहसीलदार कार्यालय, सेलू येथे नगर परिषद सेलू व नगर परिषद जिंतूरच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे ५९ मतदार मतदान करतील.


उपविभागीय अधिकारी कार्यालय, तळ मजला, संजय गांधी विभाग, गंगाखेड येथे नगर परिषद गंगाखेड, नगर पंचायत पालम आणि नगर परिषद पूर्णा येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 


तहसीलदार कार्यालय, पाथरी येथे नगर परिषद पाथरी, नगर परिषद मानवत आणि नगर परिषद सोनपेठ येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे ७४ मतदार मतदान करतील.


दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी दि. २२ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथील तळमजल्यावरील हॉल क्रमांक १ मध्ये होणार आहे. 


********

हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी अर्ज करावेत

 



हिंगोली(जिमाका), दि. 15 : हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या. (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. यांची उपकंपनी) जिल्हा कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज व अनुदान योजनांकरिता पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

महामंडळाकडे अनुदान योजनेअंतर्गत ०२ कर्ज प्रकरणे, बीज भांडवल योजनेअंतर्गत ०२ कर्ज प्रकरणे, थेट कर्ज योजनेअंतर्गत ०४ कर्ज प्रकरणे, एनएसएफडीसी योजनेअंतर्गत ०१ कर्ज प्रकरण, एनएसएफडीसी सूक्ष्मपत पुरवठा योजनेअंतर्गत ०१ प्रकरण तसेच एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत ०१ प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

हिंदू खाटीक समाजातील इच्छुक व पात्र अर्जदारांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी माहे ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी व अर्ज सादर करण्यासाठी हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा.

अर्जासोबत जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच व्यवसायाचे परवाना (लायसन्स) इत्यादी कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. 

हिंदू खाटीक समाजातील पात्र नागरिकांनी उपलब्ध योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

***

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांनी महामंडळाच्या कर्ज व बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा

 


हिंगोली(जिमाका), दि. 15 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे कर्ज व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

महामंडळामार्फत अनुदान योजनेअंतर्गत १० कर्ज प्रकरणांचे तसेच बीज भांडवल योजनेअंतर्गत १० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील पात्र व इच्छुक अर्जदारांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी माहे ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने http://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड,आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाच्या जागेचा पुरावा,दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, व्यवसायाचे परवाना (लायसन्स) आदी कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. 

पात्र लाभार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

****

स्वाधार शिष्यवृत्ती योजनेसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज अनिवार्य

 




हिंगोली(जिमाका), दि. १५ : अनुसूचित जातीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी आता शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी दिली आहे.


सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी  https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज नोंदवावा.


शालेय अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून, इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.


गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी एखाद्या विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तर अशा विद्यार्थ्याला स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्जच करणार नाहीत, त्यांना वसतिगृह तसेच स्वाधार या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.


ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृह प्रवेश अर्ज वेळेत सादर करावा, जेणेकरून भविष्यात स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे आवाहन सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे.

संबंधित मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता




हिंगोली(जिमाका), दि. १५ : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’चा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने ही कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा विचार करण्यात येणार आहे.

योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाणार आहे. तसेच सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांनी ‘एकरकमी समझोता’ योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यास ते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे थकीत पीक कर्ज असल्यास, शासनाच्या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी सुरेखा फुफाटे यांनी दिली.

माहिती अपूर्ण असल्यामुळे कोणताही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि जमीन नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. तसेच मयत खातेदारांच्या वारसांची नोंद पूर्ण करून अॅग्रीस्टॅक नोंदणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६  संदर्भात समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी सुरेखा फुफाटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजीत झोडगे तसेच विविध व्यापारी बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

या बैठकीत कर्जमाफी अर्ज स्वीकारण्याबाबतचे नियोजन निश्चित करणे, आधार कार्ड व अॅग्रीस्टॅक नोंदणीची प्रलंबित कामे तसेच मयताच्या वारसाच्या नोंदी पूर्ण करण्यासाठी विशेष मेळाव्यांचे आयोजन करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी जनजागृती व नोंदणी शिबिरे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

*******

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी अंतुलेनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत








हिंगोली(जिमाका), दि. १५ : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी हिंगोली शहरातील अंतुलेनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उन्हाळी सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. शाळा परिसर आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात, पुष्पगुच्छ देऊन तसेच विविध स्वागतपर उपक्रमांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्येही शाळेबाबत उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे, अभ्यासाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक व इतर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेतील उपलब्ध शैक्षणिक सुविधा, शासनाच्या विविध विद्यार्थी हिताच्या योजना आणि शिक्षणाच्या माध्यमातून घडणाऱ्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नव्या शैक्षणिक वर्षात मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, डिजिटल शिक्षण, मूलभूत सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांवर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, अभ्यासक्रम, शालेय उपक्रम तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही आनंदाने शाळेत प्रवेश घेत नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली.

शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या स्वागत कार्यक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, उत्साह आणि नव्या संकल्पांसह करण्यात आली. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.

****

गोदामाचे वादळी वारा व पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर वखार महामंडळाकडून तातडीच्या उपाययोजना

 


* साठा सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर



हिंगोली(जिमाका), दि. 15 : हिंगोली एमआयडीसी परिसरात शनिवारी (दि.१३) झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने जवळा बाजार वखार केंद्रांतर्गत भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या एका गोदामाचे पत्रे व सांगाडा उडून गेला. या घटनेमुळे गोदामात साठवून ठेवलेल्या हरभरा साठ्याचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी शासन व शेतकऱ्यांचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या तूर, हरभरा व सोयाबीन साठ्याची विक्रमी प्रमाणात साठवणूक करण्यात आली आहे. यासाठी महामंडळाच्या स्वमालकीच्या गोदामांसह आवश्यकतेनुसार भाडेतत्त्वावरील गोदामांचाही वापर करण्यात येत आहे.

नुकसानग्रस्त गोदामात साठवलेला हरभरा साठा हा खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन नाफेड व एनसीसीएफच्या नावे असल्याने संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची संपूर्ण रक्कम अदा करण्यात आलेली आहे. त्यामुळे या घटनेमुळे शेतकऱ्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

साठ्याचे नुकसान होऊन शासनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने संपूर्ण साठ्याचा विमा उतरविला असून गोदाम मालकानेही गोदामाचा विमा काढलेला आहे. नुकसानीची पाहणी विमा कंपनीमार्फत करण्यात येत असून भरपाईची प्रक्रिया नियमानुसार राबविण्यात येणार आहे. याबाबत विमा कंपनीकडून सखोल सर्वेक्षण सुरू असून या प्रक्रियेत महामंडळाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच विभागीय स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही तपासणी व नियंत्रणाची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, साठ्याचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विभाग प्रमुख, लातूर, साठा अधीक्षक जवळा बाजार तसेच इतर अधिकारी व प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित राहून गोदामातील साठा सुरक्षितपणे अन्य गोदामांमध्ये हलविण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत.

महामंडळाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या विभागीय कार्यालय, लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*******

जवाहर नवोदय विद्यालय वसमत येथे इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेशासाठी सुवर्णसंधी

 


हिंगोली(जिमाका), दि. 15 : जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 11 वी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी गुणानुक्रमे अर्ज मागविण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालय प्रशासनाने केले आहे.

प्रवेशासाठी अर्ज करणारा विद्यार्थी हिंगोली जिल्ह्यातून इयत्ता 10 वी परीक्षेत किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा. तसेच विद्यार्थ्याची जन्मतारीख 1 जून 2009 ते 31 जुलै 2011 या कालावधीत असणे आवश्यक आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय समितीने निर्धारित केलेल्या नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह दि. 25 जून 2026 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय, वसमत येथे जमा करावेत.

अर्जाचा नमुना तसेच प्रवेशासंबंधी सविस्तर माहिती www.navodaya.gov.in⁠ तसेच https://navodaya.gov.in⁠/nvs-school/Hingoli/en/home/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या प्रवेश प्रक्रियेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एम. ए. घोनशेटवाड यांनी केले आहे.

********

14 June, 2026

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा विकासकामांचा आढावा दौरा

 


कामांना गती, गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर भर; अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना







हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी तालुक्यातील उमरदरावाडी, येडशी, तोंडापूर, भुशी व उमरदरी या गावांना भेट देऊन विविध शासकीय योजनांअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा सखोल आढावा घेतला.


 विकासकामे अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी त्यांनी संबंधित विभागांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना दिल्या.

उमरदरावाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या तलावाच्या कामाची पाहणी करताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. कामे निर्धारित वेळेत पूर्ण होऊन त्याचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी १४ वा व १५ वा वित्त आयोग निधीतून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचीही पाहणी करण्यात आली. सार्वजनिक निधीचा पारदर्शक व परिणामकारक वापर होऊन नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी नियमित देखरेख ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

पाहणी दौऱ्यादरम्यान येडशी, तोंडापूर व भुशी येथील पारझर तलाव तसेच जलसंधारण विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच ॲग्री स्टॉक प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या. उमरदरी येथील तलावाच्या कामाचीही पाहणी करून विकासकामे अधिक परिणामकारक करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या या दौऱ्यामुळे विविध विकासकामांच्या प्रगतीला चालना मिळणार असून कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि गती सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

12 June, 2026

जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. 12 : जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांचा सर्वांगीण क्रीडा विकास साधण्यासाठी जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र, हिंगोली कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रासाठी मैदानी (अॅथलेटिक्स) क्रीडा प्रकाराकरिता बाह्य स्रोत यंत्रणेद्वारे क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयाने दिली आहे.

या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक असून बी.पी.एड., एम.पी.एड. किंवा क्रीडा विज्ञानातील पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच एन.आय.एस. डिप्लोमा इन कोचिंग (अॅथलेटिक्स) किंवा समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केलेला, अथवा वर्ल्ड अॅथलेटिक्स संघटनेचा लेव्हल-1 कोर्स अथवा सहा आठवड्यांचा एन.आय.एस. प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवारास किमान एक वर्षाचा राज्यस्तरीय प्रशिक्षणाचा अनुभव असावा. राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी खेळाडूंना प्रशिक्षण दिल्याचा अनुभव तसेच युवा खेळाडूंसोबत काम केलेल्या प्रशिक्षकांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे व कमाल 45 वर्षे असावे. मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य असून इंग्रजी भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.

याशिवाय उमेदवार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पदकविजेता खेळाडू असावा. खेळाडूंच्या प्रगती नोंदी, अहवाल सादर करणे व डेटा व्यवस्थापनासाठी मूलभूत संगणक ज्ञान आवश्यक आहे. शासनमान्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणेही बंधनकारक राहणार आहे.

उपरोक्त निकषांनुसार पात्र क्रीडा मार्गदर्शकाची नेमणूक करण्यास इच्छुक बाह्य यंत्रणांनी आपल्या दरपत्रकासह अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे दि. 15 जून 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी डॉ. निलकंठ श्रावण (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.


*********

जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त स्वाक्षरी मोहीम व बाल कामगार शोध अभियान

 



हिंगोली (जिमाका), दि. 12 : जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात जनजागृतीपर स्वाक्षरी मोहीम आणि बाल कामगार शोध अभियान राबविण्यात आले.

या मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


स्वाक्षरी मोहिमेनंतर शहरातील विविध भागांत बाल कामगार शोध मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत हॉटेल, वर्कशॉप, दुकाने तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित व्यावसायिकांना बालकामगार न ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच बालकामगार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

या अभियानाचा मुख्य उद्देश बालकामगार प्रथा रोखणे, बालकांच्या शिक्षण व संरक्षणाच्या हक्कांचे जतन करणे तसेच बालकामगार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा होता. बालकांना शिक्षण, संरक्षण आणि सुरक्षित बालपणाचा हक्क मिळावा यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नागरिकांनी आपल्या परिसरात कोणतेही बालक काम करताना आढळल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098, स्थानिक पोलीस ठाणे किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

या मोहिमेत कामगार विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. बालकांचे शिक्षण, संरक्षण व सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी अशा जनजागृतीपर आणि तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

******

पीएलएफएस व एएसयूएसई राष्ट्रीय सर्वेक्षणांचा हिंगोलीत शुभारंभ

 

विश्वसनीय माहितीच्या आधारे विकास नियोजनाला चालना; नागरिकांनी सर्वेक्षणास सहकार्य करावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली (जिमाका), दि. 12 : केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पीरिऑडिक लेबर फोर्स सर्वे (पीएलएफएस) आणि ॲन्युअल सर्वे ऑफ अनइन्कॉर्पोरेटेड एंटरप्रायझेस (एएसयुएसई) या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन करून करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपआयुक्त एस. एम. रचावाड, जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील कर्मचारी तसेच आयपॉस संस्थेचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी रोजगार, बेरोजगारी, स्वयंरोजगार, उद्योग-व्यवसायांची स्थिती आणि असंघटित क्षेत्रातील आर्थिक उपक्रमांची अचूक माहिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी या सर्वेक्षणांचे महत्त्व अधोरेखित केले. रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक-आर्थिक विकास योजना तसेच विविध धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या सर्वेक्षणातून मिळणारी माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पीएलएफएस सर्वेक्षणाद्वारे जिल्ह्यातील नागरिकांची रोजगार, बेरोजगारी, व्यवसाय, कामाचे स्वरूप, शिक्षण आणि सामाजिक-आर्थिक स्थिती यासंदर्भातील माहिती एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत प्रत्यक्ष भेटी व मुलाखतींच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील श्रमबाजाराची सद्यस्थिती, महिला कामगारांचा सहभाग, स्वयंरोजगार आणि वेतनाधारित रोजगाराबाबतची अद्ययावत माहिती या सर्वेक्षणातून उपलब्ध होणार आहे.

एएसयूएसई सर्वेक्षणाद्वारे नोंदणीकृत नसलेल्या बिगर कृषी क्षेत्रातील लघुउद्योग, सेवा व्यवसाय, दुकाने, कार्यशाळा, घरगुती उद्योग आणि इतर असंघटित व्यावसायिक उपक्रमांची माहिती एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत गोळा केली जाणार आहे. असंघटित क्षेत्रातील रोजगार, उत्पादनक्षमता, उत्पन्न, स्थूल मूल्यवर्धन आणि आर्थिक निर्देशकांची माहिती संकलित करून राज्य व जिल्हास्तरीय उत्पन्नाचे अंदाज तसेच विकास निर्देशांक तयार करण्यास मदत होणार आहे.

सर्वेक्षणासाठी आयपॉस संस्थेमार्फत नियुक्त अधिकृत क्षेत्रीय कर्मचारी तसेच सांख्यिकी अधिकारी नागरिकांच्या घरी व उद्योग आस्थापनांमध्ये भेट देणार आहेत. नागरिकांनी व उद्योजकांनी त्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वेक्षणामध्ये देण्यात आलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून ती केवळ सांख्यिकीय उद्देशासाठी वापरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

जिल्हा प्रशासन, हिंगोली आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून “विश्वसनीय माहिती – सक्षम नियोजन – विकसित भारत” या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

******

11 June, 2026

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






*नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर 


*पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट


*आकांक्षित जिल्हे-तालुक्यांच्या शाश्वत विकासावर विशेष भर


*युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी  देण्याचे नियोजन


नवी दिल्ली, दि. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख बाबींवर महाराष्ट्र शासन विशेष भर देत आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीसोबतच समतोल व सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रात व्यापक प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.



राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या (गव्हर्निंग कौन्सिल) अकराव्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाचा रोड मॅप सादर केला. या बैठकीस केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोककुमार लाहिडी आणि सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  एकूण सकल देशांतर्गत उत्पन्नात सुमारे १४ टक्के योगदान देणारे महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित होत असल्या तरी सुशिक्षित, कुशल, निरोगी आणि सक्षम नागरिक हीच महाराष्ट्राची खरी ताकद आहे. या पार्श्वभूमीवर विकसित महाराष्ट्र - २०४७ हे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करण्यात आले असून २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर, २०३५ पर्यंत दोन ट्रिलियन आणि २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील सर्व विभागांनी २०२९-३० पर्यंतच्या कालावधीसाठी कृती आराखडे तयार केले असून शाश्वत विकास उद्दिष्टांची वेळेत पूर्तता करण्यावर राज्याचा भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 आकांक्षित जिल्ह्यांची संख्या चारवरून दहापर्यंत आणि आकांक्षित तालुक्यांची संख्या २७ वरून १७७ पर्यंत वाढविण्यात आली असून या भागांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. 

*पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत व्यापक सुधारणा*

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० ची सर्वसमावेशक अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले बहुविद्याशाखीय शिक्षण, मल्टिपल एन्ट्री-एक्झिट प्रणाली, कौशल्य आधारित अभ्यासक्रम, इंटर्नशिप तसेच एआय, रोबोटिक्स, डेटा सायन्स आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात समावेश करण्यात येत आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात देशातील पहिली जागतिक दर्जाची एज्युसिटी विकसित करण्यात येत असून ती देश-विदेशातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षण केंद्र ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्व प्राथमिक शिक्षण मजबूत करण्यासाठी ‘पोषण भी – पढाई भी’, आरंभ, स्मार्ट अंगणवाडी आणि सक्षम अंगणवाडी यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. बालस्नेही शिक्षण वातावरण निर्माण करण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर आणि अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण सुरू आहे. शालेय शिक्षणात महाराष्ट्राची परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये प्रचेष्टा-१ कडे वाटचाल सुरू आहे. राज्यात २ कोटी आठ लाखांपेक्षा अधिक ‘अपार आयडी’ तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणणे, डिजिटल वर्ग, व्यावसायिक शिक्षण तसेच मुली, आदिवासी व विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक शिक्षण सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट राज्याने ठेवले आहे.


*कौशल्य विकास, स्टार्टअप आणि नवसंशोधनाला चालना*

 राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून राज्यात ३ लाख ३० हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी नोंदणीकृत आहेत. महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नवसंशोधन धोरण २०२५ अंतर्गत पुढील पाच वर्षांत १ लाख २५ हजार उद्योजक घडविणे आणि ५० हजार स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एआय, डीप-टेक, फिनटेक आणि शाश्वतता या क्षेत्रांवर विशेष भर दिला जात असून ‘महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी’ विकसित करण्यात येत आहे. तसेच कुशल युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी' ही संस्था स्थापन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


*आरोग्य क्षेत्रात व्यापक विस्तार*

आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य कटिबद्ध असून आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार पॅकेजेसची संख्या २३९९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात ४५३७ रुग्णालये या योजनांशी संलग्न करण्यात आली आहेत.

शहरी भागांसाठी स्वतंत्र शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्यात आले असून ११ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे काम सुरू आहे. मेडिसिटी संकल्पनेद्वारे वैद्यकीय शिक्षण, संशोधन, तृतीयक आरोग्यसेवा आणि आयुष प्रणाली यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


*महिला सक्षमीकरणाला गती*

महिला सक्षमीकरण हे आर्थिक विकासाचे प्रमुख साधन असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उमेद अभियानाअंतर्गत राज्यात ५० लाख लखपती दिदी  झाल्या असून ही संख्या एक कोटीपर्यंत नेण्याचा मानस आहे. बचत गटांच्या उत्पादनांसाठी १३ जिल्हास्तरीय उमेद मॉल्स उभारण्यात येत आहेत.

लाडकी बहीण योजनेतर्गत सध्या १.६६ कोटी महिला लाभार्थी असून या योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता आणि आरोग्य सुधारण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.


*सर्वसमावेशक विकासावर भर*

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून संधी निर्माण करण्यावर राज्याचा भर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी १०० नवीन वसतिगृहे उभारण्यात येत असून त्यात २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची व्यवस्था होणार आहे.


*प्रशासनात तंत्रज्ञान आणि सुधारणा*

मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राने ८०० हून अधिक नागरिक आणि व्यवसाय सेवांची प्रक्रिया पुनर्रचना केली आहे. महासारथी आणि महाडीबीटी २.०द्वारे नागरिक सेवा अधिक सुलभ करण्यात येत आहेत. अर्जातील रकाने आणि कागदपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे. महाराष्ट्र एआय धोरण २०२६ अंतर्गत १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि १.५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषी क्षेत्रासाठी महाअॅग्री-एआय धोरण महाअॅगएक्स आणि महाट्रेस यांसारखे डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.


*गडचिरोलीसाठी विशेष विकास आराखडा*

गडचिरोली जिल्ह्यासाठी नक्षलग्रस्त भागोत्तर विकास कार्ययोजना राबविण्यात येत असून पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. गडचिरोलीला भारतातील पहिले मोठे इंटिग्रेटेड स्टील हब म्हणून विकसित करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


*पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना*

‘एक राज्य, एक जागतिक पर्यटन स्थळ’ योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग आणि नाशिक या ठिकाणांचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे. राज्यभरात १०० पर्यटन उप-परिपथ विकसित करण्याचे उद्दिष्ट असून धार्मिक, वारसा, जल, बेट आणि अनुभवात्मक पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.राज्यात ६३.८५ लाखांहून अधिक एमएसएमई कार्यरत असून २.५ कोटींहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. भारतातील एकूण एफडीआयपैकी सुमारे ३१ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचे नमूद करून 

महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ अंतर्गत २०.३ लाख कोटींच्या गुंतवणुकीची पाइपलाईन तयार झाली आहे. मैत्री प्रणालीद्वारे सिंगल विंडो क्लिअरन्स, वेळेत मंजुरी आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन करण्यास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकसित भारत २०४७ साठी महाराष्ट्र शासनाची कटिबद्धता व्यक्त करत केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सहकार्याने देशाला समृद्ध, आत्मनिर्भर आणि न्याय्य राष्ट्र बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.

******

हिंगोली येथे कमोडिटी जागरूकता कार्यशाळा संपन्न · शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदा बाजार, गुणवत्ता निकष व किंमत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

 




 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) वायदा बाजाराची माहिती, हळदीच्या गुणवत्ता-आधारित व्यापाराची संकल्पना आणि बाजारपेठेतील संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय कमोडिटी जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत सुमारे 150 शेतकरी, एफपीओ प्रतिनिधी, कृषी उद्योजक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध घटकांनी सहभाग नोंदविला.

या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश लहाने, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड तसेच ललित बहाले, गुणवंत पाटील हंगरगेकर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील प्रमुख हळद उत्पादक क्षेत्रांपैकी असलेल्या मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना कमोडिटी बाजारपेठेची माहिती थेट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत बाजारपेठेतील किंमत निर्धारण, बाजारातील चढ-उतार आणि जोखीम व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या कार्यशाळेदरम्यान शेतकऱ्यांना मंडई व एक्सचेंजमधील किमतींतील फरक, किमतींच्या निर्धारणामागील घटक तसेच किंमतीतील चढ-उतारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी उपलब्ध साधनांची माहिती देण्यात आली. याशिवाय वायदा बाजाराविषयी असलेले गैरसमज दूर करणे, किंमत ठरविण्याचे फायदे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पूरक ठरणाऱ्या पर्यायी बाजारपेठा, मालगोदाम व्यवस्था, गुणवत्ता निकष आणि आधार केंद्रांच्या उभारणीसंदर्भातील बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी कमोडिटी विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांच्या मध्यस्थीखाली झालेल्या पॅनेल चर्चेत वायदा बाजाराची कार्यपद्धती, नियामक तरतुदी आणि बाजारातील व्यवहार प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच एफपीओ प्रमुख सूर्यजी शिंदे यांनी हळद वायदा बाजार आणि ऑप्शन्स करारांमधील स्वतःचा अनुभव सहभागींसमोर मांडला. गुणवत्ता निकष, वाहतूक खर्च, विक्री खर्च आणि व्यवहाराची वेळ स्वतः ठरवून बाजारपेठेतील संधींचा कसा लाभ घेता येतो, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या माध्यमातून एफपीओंना उपलब्ध असलेल्या आर्थिक सहाय्य योजनांची माहितीही देण्यात आली. यामध्ये तपासणी खर्चाची 100 टक्के परतफेड तसेच स्वच्छता, वर्गवारी, वाळवणे आणि वाहतूक खर्चाच्या 75 टक्क्यांपर्यंत परतफेडीची तरतूद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एक्सचेंज-आधारित व्यवहारांमध्ये शेतकरी गटांचा खर्च कमी होण्यास मदत होत असल्याचे नमूद करण्यात आले.

शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (एफपीओ) आधुनिक बाजारपेठेतील संधींचा लाभ घेण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

अधिक माहितीसाठी www.ncdex.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनसीडीईएक्सच्या किसान कॉल सेंटरशी 1800-103-4861 या क्रमांकावर  व एनसीडीईएक्सचे स्थानिक प्रतिनिधी रोहन धांडे (मो. 9130897105) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

******

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या नावात व नियमावलीत सुधारणा; सर्व प्रवासी वाहन चालकांना सदस्यत्वाचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 11 : राज्यातील ऑटो-रिक्षा, मीटर्ड टॅक्सी तसेच इतर प्रवासी वाहन चालक-मालकांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या नावामध्ये शासनाने सुधारणा केली असून, शुद्धीपत्रकान्वये सदर मंडळाचे नाव आता धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ असे करण्यात आले आहे.

तसेच मंडळाच्या नियमावलीतही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, सभासदत्वासाठीच्या पात्रतेमध्ये सुधारणा करून सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणारे बॅजधारक अनुज्ञप्तीधारक (लायसन्सधारक) चालक मंडळाचे सदस्य होण्यासाठी पात्र ठरणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाधिक प्रवासी वाहन चालकांना मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

मंडळामार्फत सदस्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत असून त्यामध्ये जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास 50 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, राज्य शासन निर्देशित इतर कल्याणकारी योजना, 65 वर्षांवरील ऑटो-रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान, नवीन वाहन व गृह खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची अंशतः प्रतिपूर्ती तसेच राज्यस्तरीय मंडळाने वेळोवेळी मान्यता दिलेल्या इतर योजनांचा समावेश आहे.

मंडळाचे सदस्यत्व घेतल्यानंतर पात्र बॅजधारक प्रवासी वाहन चालकांना वरील सर्व योजनांचा लाभ मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्रवासी वाहने चालविणारे अनुज्ञप्तीधारक चालकांनी मंडळाचे सदस्यत्व घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी केले आहे.

सदस्यत्व नोंदणीसाठी चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org⁠ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत परिवहन विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

*******

लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला गती, पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

 

• पशुधन संरक्षणासाठी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविण्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. 11 : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. सन 2026-27 या वर्षासाठी आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे सुरू असून, 21 व्या पशुगणनेनुसार राज्यातील गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन पहिल्या टप्प्यात एकूण उत्पादनाच्या 40 टक्के म्हणजेच 37 लाख 52 हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी ही लसीकरण मोहीम युद्धपातळीवर आणि तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे यांनी आवश्यक लसमात्रांचे उत्पादन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. लसींचे वितरण जिल्हास्तरावर सुरू असून, लस क्षेत्रीय स्तरावर पोहोचविताना शीतसाखळी (कोल्ड चेन) कुठेही खंडित होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणेचे सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. याहयाखान पठाण यांनी सर्व जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांना निर्देश देताना सांगितले की, गोटपॉक्स लसमात्रा प्राप्त होताच जिल्ह्यातील अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षम पशुधनाचे प्राधान्याने लसीकरण करावे. तसेच लसीकरण मोहिमेचा विहित नमुन्यातील बिनचूक आणि एकत्रित दैनंदिन अहवाल दररोज सकाळी 11 वाजेपर्यंत विभागनिहाय संस्थेकडे सादर करावा.


हॉटस्पॉट तालुक्यांवर विशेष लक्ष


गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला होता, त्या हॉटस्पॉट भागांमध्ये प्राधान्यक्रमाने लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यापक मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक तसेच पशुसंवर्धन क्षेत्रातील विविध सेवादात्यांचे सहकार्य घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे.


पशुधनाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य


लम्पी चर्मरोगासारख्या संसर्गजन्य आजारांपासून राज्यातील गोधनाचे संरक्षण करणे हे पशुसंवर्धन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा तसेच शेतकरी बांधवांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी गोटपॉक्स लसीकरण हा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असून, सद्यस्थितीत ही मोहीम राज्यभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. पशुपालकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील केले आहे.

राज्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे वेळेत लसीकरण करून घेण्यासाठी स्थानिक शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने व पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.

******

मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेस प्रारंभ

 


• पशुधनाचे आरोग्य संरक्षण व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन



हिंगोली (जिमाका), दि. 11 : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत ‘मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम’ राज्यभर युद्धपातळीवर व मोहीम स्वरूपात राबविण्यात येत आहे. पशुधनाचे आरोग्य अबाधित राखणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असून, निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्यांकित उद्दिष्टांची शंभर टक्के पूर्तता करण्यासाठी विभागाने सर्वंकष व काटेकोर नियोजन केले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

पावसाळ्याच्या काळात पशुधनामध्ये घटसर्प व फऱ्या यांसारख्या घातक आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय असल्याने राज्यभर लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

लसीकरण मोहिमेअंतर्गत लसींची गुणवत्ता व परिणामकारकता अबाधित राहण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. राज्यस्तरापासून ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय उपकेंद्रांपर्यंत लसींची वाहतूक करताना आवश्यक तापमान राखण्यासाठी अद्ययावत कोल्ड बॉक्सचा वापर करण्यात येत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यकतेनुसार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली असून, ही पथके गावागावांत तसेच गोठ्यांपर्यंत प्रत्यक्ष भेट देऊन ‘डोअर स्टेप’ पद्धतीने लसीकरणाची सेवा देत आहेत. एकाही जनावराचे लसीकरण राहू नये, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्याच्या काळात जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्या यांचे वेळेत लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. यामुळे संभाव्य रोगप्रादुर्भाव रोखण्यास मदत होऊन पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळता येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे मान्सूनपूर्व लसीकरण करून घेण्यासाठी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी अथवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

******

शासकीय वेतन देयके ई-बिल पद्धतीने सादर करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तांत्रिक ज्ञान आत्मसात करावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

शासकीय वेतन देयके आता ई-बिल पद्धतीने  करण्यासाठी  जिल्हाधिकारी  कार्यालयात  प्रशिक्षण  संपन्न





हिंगोली (जिमाका), दि. 11 : शासनाच्या वित्तीय व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणि वेळेची बचत साधण्यासाठी शासकीय वेतन देयके ई-बिल पद्धतीने सादर करण्याची  प्रणाली  प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या प्रणालीचा यशस्वी वापर करण्यासाठी अधिकारी  व कर्मचाऱ्यांनी आवश्यक तांत्रिक ज्ञान आत्मसात करून ई-बिल प्रणालीचा काटेकोरपणे वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी  यावेळी  केले.

जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शासकीय वेतन देयके ई-बिल पद्धतीने सादर करण्याबाबत अधिकारी  व कर्मचारी  प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.

यावेळी  जिल्हा कोषागार अधिकारी  मंजीत गोरेगावकर , अपर कोषागार अधिकारी   बी.जी. कुरे , उपकोषागार अधिकारी व्ही.जी. गोविंदवार, कळमनुरीचे उपकोषागार अधिकारी  श्री. सातपुते, औंढा नागनाथचे उपकोषागार अधिकारी प्रसाद कमलेश्वर, विविध विभागांचे आहरण व संवितरण अधिकारी, लेखाधिकारी, अधीक्षक तसेच संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता म्हणाले की, राज्य शासनाने शासकीय कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यावर भर दिला असून ई-बिल प्रणाली ही त्यातील एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. पारंपरिक पद्धतीने वेतन देयके सादर करताना लागणारा वेळ, कागदपत्रांची पूर्तता आणि विविध स्तरांवरील प्रक्रियेमुळे निर्माण होणारा विलंब टाळण्यासाठी ई-बिल प्रणाली उपयुक्त ठरत आहे. या प्रणालीमुळे वेतन देयकांची प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक व त्रुटीरहित होणार आहे. ई-बिल प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे कार्यालयीन कामकाजाचे डिजिटायझेशन होऊन कागदविरहित प्रशासनाला चालना मिळणार आहे. तसेच देयकांच्या प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, वेळेत मंजुरी मिळविणे आणि वित्तीय शिस्त राखणे शक्य होणार असल्याचे सांगितले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात  अंकुश  दवाडे, राहुल गुमे, वैभव राऊत या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी  ई-बिल प्रणालीमध्ये वेतन देयके तयार करणे, आवश्यक माहिती भरणे, देयकांची ऑनलाइन सादर प्रक्रिया, त्रुटींचे निराकरण तसेच प्रणालीच्या विविध तांत्रिक बाबींविषयी सविस्तर माहिती  दिली. यावेळी सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.

कार्यक्रमाचे  प्रास्ताविक जिल्हा कोषागार अधिकारी  मंजीत गोरेगावकर यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अविनाश भगत यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

*******