30 May, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वीज पडून मृत्यू पावलेल्या मयतांच्या वारसांना सानुग्रह अनुदाचे धनादेश वाटप

हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्ह्यातील वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या मयतांच्या वारसाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशाद्वारे प्रत्येकी 4 लाख रुपयाचे सानुग्रह अनुदानाचे वितरण करण्यात आले. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगव्हाण येथील यादवराव पिराजी दांडेगावकर (वय 55 वर्षे) यांचे वारस श्रीमती कुसूमबाई यादवराव दांडेगावकर, सेनगाव तालुक्यातील सुलदली बु. येथील रुस्तुमा यशवंत शिंदे (वय 47 वर्षे) यांचे वारस श्रीमती गोदावरी रुस्तुमा शिंदे यांना तसेच पार्डी पोहकर येथील श्रीमती मुक्ता रामगीर गिरी (वय 42 वर्षे) यांचे वारस रामगीर छडानंद गिरी यांना प्रत्येकी 4 लाख रुपये सानुग्रह अनुदानाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंगोली येथील आयोजित शेतकरी व महिला मेळाव्यात वितरीत करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, संजय केणेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. *******

No comments: