·
नुकसानग्रस्तांना मदत,
भूकंपरोधक घरकुलांना प्राधान्य
·
गावांसाठी तातडीच्या
उपाययोजनांचे दिले निर्देश
.jpeg)
यावेळी जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती
घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, भूकंपबाधित गावांचे तातडीने
पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना
तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.
भूकंपाच्या अनुषंगाने
गावपातळीवर तातडीच्या कामांसाठी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपये
राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. तसेच अंगणवाडी व शाळांच्या
इमारतींची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या बांधकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यास
सांगितले.
भूकंपामुळे ज्या घरांचे
नुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्यात
येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पात्र लाभार्थ्यांचे घरकुल योजनेचे प्रस्ताव
तातडीने सादर करण्याचे निर्देश देत, शासनाच्या इष्टांकानुसार घरकुले मंजूर करण्यात
येतील, असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी भविष्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा विचार करून भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा
वापर करून घरकुलांची उभारणी करण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही नमूद केले. सुरक्षित,
टिकाऊ आणि दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
भूकंपानंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,
तसेच कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी
संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी केले.
*****
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


No comments:
Post a Comment