28 January, 2025

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोली (जिमाका), दि. 28 : आज ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कवि संमेलनात कवींनी सामाजिक, शैक्षणिक, गेय तसेच राजकीय विडंबनविषयक कवितांचे सादरीकरण केले. या कवि संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. राजाराम बनसकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी प्रमुख कवी प्रा. विलास वैद्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कवी संमेलनात प्रा. विलास वैद्य यांनी काल माझ्या सपना कागुद ग आला, प्रकाश अंभोरे यांनी पाऊस मोलाचा, गोडाजी काळे यांनी तुका, श्रीमती पारिजात देशमुख यांनी माझं घरटे, गणेश आघाव यांनी पोरी शाळेत निघाल्या, सिंधूताई दहिफळे यांनी अवकाळी पावसाचा कहर होतो, करण हरण यांनी कुठे आहे आराम जीवाला, संगीता चौधरी यांनी नेहमीच पाँझेटीव्ह राहायचे, अनिकेत देशमुख यांनी नांगराचा फाळ असते, भजनाचा टाळ असते, सुमन दुबे यांनी गजल, दिगांबर जाधव यांनी शाळा अनुदान, राधिका देशमुख यांनी बोबड्या बाळाची कविता, राजकुमार मोरगे यांनी तिला भेटलो म्हणून बरे वाटते, प्रिया धुमाळ यांनी सखी, गणेश येवले यांनी गझल, दर्शना भुरे यांनी नात्यातील गैरसमज, हर्षवर्धन परसवाळे यांनी माय मराठी, प्रा. डॉ.अंजली टापरे यांनी वाट, विजय गुंडेकर यांनी स्वातंत्र्य सैनिक, सुप्रिया दापके यांनी निपुण हिंगोली, रघुनाथ घुगे यांनी स्वार्थ, डॉ. वंदना काबरा यांनी मायची माया, बबन दांडेकर यांनी मानवता, राजाभाऊ बनसकर यांनी टाळ, शिला कांबळे यांनी रमाई, प्रशांत बाहेती यांनी मेरी नौकरी, डॉ.दिलीप धामणे यांनी झोका, शिलवंत वाढवे यांनी शेतकऱ्यांची व्यथा ही कविता सादर केली. यावेळी प्रा. विलास वैद्य यांनी कविता हा माझा प्राण असल्याचे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर या कवि संमेलनाचा अध्यक्षीय समारोप प्रा. राजाराम बनसकर यांनी केले. प्रास्ताविक अशोक अर्धापूरकर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रतन आडे, कलानंद जाधव यांनी केले. तर शेवटी आभार मिलींद सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष ससे, संतोष सामाले, रामेश्वर गांजने, लक्ष्मण लाड, लक्ष्मण सावळे, मिलींद सोनकांबळे, शंभुनाथ दुभळकर यांनी परिश्रम घेतले. या कवी संमेलनास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

No comments: