22 May, 2024

गावात चारा व पाणी टंचाईची समस्या भासल्यास संबंधित तहसीलदारांना माहिती द्यावी- जिल्हाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. २२ : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व जनतेनी आपल्या गावामध्ये चारा टंचाई किंवा पाणी टंचाईची समस्या भासत असल्यास या बाबतची लेखी माहिती संबंधीत तहसीलदार यांच्याकडे सादर करावी. जेणे करुन प्रकरणात 5 दिवसात चौकशी करुन आवश्यक ती उपाययोजना करण्याकरीता निर्णय घेण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. ***

No comments: