19 August, 2020

पेनगंगा नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

 

पेनगंगा नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

 

हिंगोली, दि.19: इसापूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात सातत्याने पर्जन्यमान होत असल्याने आज रोजी इसापूर धरण 73 टक्के भरले आहे. तसेच प्रकल्पाच्या वरच्या भागातील देखील धरणे भरली आहेत. या धरणातून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला असल्याने धरणाच्या पाणी पातळीत अतिशय वेगाने वाढ होत आहे. सद्या धरणात अंदाजे 753.00 घनमी/सेकंद इतकी पाण्याची आवक होत असून याच प्रमाणात धरणात आवक येत राहिल्यास येणाऱ्या 4 ते 5 दिवसात 100 टक्के धरण भरण्याची शक्यता आहे. यामुळे इसापूर धरणातून पेनगंगा नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे पेनगंगा नदीला पूर येऊ शकतो.

संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून पेनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांना आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी स्थलांतर करणेबाबत संबंधित तहसिलदार, पोलीस विभाग यांनी आपल्यास्तरावरुन सूचना द्याव्यात असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी केले आहे.

****

No comments: