21 December, 2020

डी.एल.एड प्रवेश प्रक्रिया सन 2020-21 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

डी.एल.एड प्रवेश प्रक्रिया सन 2020-21 साठी

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली, दि. 21:  सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येतील. प्रवेश प्रक्रीया खालीलप्रमाणे राबविण्यात येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण  परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशक्षिण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

प्रवेशाची शैक्षणिक पात्रता- इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.5 %  व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5 %  गुणांसह), प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी दिनांक 22 ते 26 डिसेंबर, 2020, पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करणे दिनांक 22 ते 27 डिसेंबर, 2020, प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे) खुला संवर्ग रुपये 200/-, खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग रुपये 100/-

यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन अप्रुव्ह करुन घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती मध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन ॲप्रुव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही . या प्रक्रीयेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीन मधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे.  विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल लॉगीन मधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे अधिव्याख्याता तथा सेवापूर्व विभाग प्रमुख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांनी कळविले आहे.

00000

 

18 December, 2020

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विजय दिवस साजरा

 



हिंगोली दि. 18 :  भारताने पाकिस्तानवर 16 डिसेंबर, 1971 रोजी युद्धामध्ये विजय मिळवला त्या दिवसापासून 16 डिसेंबर हा दिवस भारतामध्ये विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने 16 डिसेंबर, 2020 रोजी संपूर्ण भारत देशामध्ये विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विजय दिनानिमित्त येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांच्या हस्ते झेंडावंदन  करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमोद्दीन फारुखी, जिल्हा कोषागार अधिकारी मा. एम. झुंजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी युद्धामध्ये शहीद झालेल्या भारतमातेच्या सुपुत्रांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. शहीद जवानांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमास शासकीय तंत्रनिकेतन येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून उत्साहाने सहभाग नोंदवला.

*****

 

 

 

‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ उत्साहात साजरा

 


 

 हिंगोली, दि. 18 : जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत आज अल्पसंख्यांक हक्क दिवस अत्यंत उत्साहात कोव्हिड 19 विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेऊन केंद्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ऑनलाईन पध्दतीने जिल्हा प्रशासनामार्फत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. किरण गिरगांवकर, सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी यांनी अल्पसंख्यांक समुदायाबाबत अत्यंत अभ्यासपूर्वक मार्गदर्शन केले.

या ऑनलाईन वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. किरण गिरगांवकर यांनी जिल्ह्यात अल्पसंख्यांकासाठी राज्य व केंद्र शासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत जिल्ह्यात अल्पसंख्यांक लोक समुदायाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाबाबत अत्यंत विस्तृत माहिती दिली. तसेच सद्यस्थितीत शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी वसतीगृह, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, अल्पसंख्यांक ग्रामपंचायतींना अनुदान, नागरी भागातील अल्पसंख्यांकासाठी सुविधा, डॉ. झाकीर हुसेन मदरसांना अनुदान, खाजगी व विनाअनुदानित शाळांना मुलभूत सुविधासाठी अनुदान, मा. पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रम आणि प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (PVJMK) अंतर्गत हिंगोली शहरामध्ये सद्भावना मंडप बांधकाम करणे इत्यादी योजनांची सविस्तर माहिती दिली. यापुढेही अल्पसंख्यांकासाठीच्या योजना अधिक चांगल्याप्रकारे राबविण्यात येतील, असे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे समन्वयक प्रभाकर मठपती यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व सर्व अल्पसंख्यांक जनतेचे आभार मानले.

****

17 December, 2020

‘ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020’ 14 व 15 जानेवारी रोजी भरणारे आठवडी बाजार रद्द

 

                                 

हिंगोली, दि. 17 : राज्य निवडणूक आयोगाने दि. 11 डिसेंबर, 2020 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020 निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा. तसेच मतदान शांततेत पार पडावे यासाठी हिंगोली जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. अशा ग्रामपंचायती मधील दि. 14 जानेवारी, 2021 व दि. 15 जानेवारी, 2021 रोजी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश प्र.जिल्‍हादंडाधिकारी शंकर बरगे यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये दिले आहेत.

हा आदेश निवडणुकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून दि. 14 जानेवारी, 2021 रोजीचे मध्यरात्री 12.00 वाजेपासून ते 15 जानेवारी 2021 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रीया होईपर्यंत अंमलात राहील. तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामूळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकांवर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी द्यावी असेही आदेशात नमूद केले आहे.

*****

निवडणूक कालावधीत सार्वजनिक, खाजगी व्यक्तींच्या जागेवर झेंडे , भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध

 


 

 हिंगोली, दि. 17 : राज्य निवडणूक आयोगाने दि. 11 डिसेंबर, 2020 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020 घोषित केला असून, कार्यक्रम घोषित केल्‍याच्‍या दिनांकापासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी काठ्यावर झेंडा लावून उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादी करीता कोणत्याही व्यक्तींची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकाची परवानगी शिवाय व संबंधित परवाना प्राधिकारणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास प्रतिबंध घालणे आवश्‍यक असल्‍याने व प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश पोलीसांनी ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करुन त्यास प्रसिध्दी देण्याचे ओदश सर्व संबंधितास नोटीस देवून त्‍यांचे म्‍हणणे ऐकून घेणे सद्य:स्थितीत शक्‍य नसल्‍याने  निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 18 जानेवारी, 2021 पर्यंत प्र.जिल्‍हादंडाधिकारी शंकर बरगे यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये त्यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

हे आदेश दि. 18 जानेवारी, 2021 रोजीच्या 23.00 वाजेपर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लागू राहतील, असे प्र.जिल्हादंडाधिकारी शंकर बरगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 01 रुग्ण ; तर 04 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


32 रुग्णांवर उपचार सुरु

 

         हिंगोली,दि. 17 : जिल्ह्यात 01 नवीन कोविड-19 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

       आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर आज 04 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़, सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 447 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 363 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 32 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 52 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*****

16 December, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 04 रुग्ण ; तर 12 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


35 रुग्णांवर उपचार सुरु

 

         हिंगोली,दि. 16 : जिल्ह्यात 04 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती तर कळमनुरी परिसरात 01 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 12 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़, सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 446 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 359 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 35 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 52 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*****