* संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आगाऊ औषधे खरेदी करावीत
हिंगोली (जिमाका), दि. १८ : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारला असल्याबाबतचे निवेदन अन्न व औषध प्रशासन विभागास प्राप्त झाले आहे.
या संपामध्ये संघटनेच्या सदस्यांनी सहभागी न होण्याबाबत दि. १८ मे २०२६ रोजीच्या पत्रान्वये विनंती करण्यात आली असली, तरी ज्या रुग्णांना नियमित औषधांची आवश्यकता आहे अशा रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.
तसेच बंद कालावधीत गरजू रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास किंवा अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. ना. सी. भालेराव यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९४०५७८३६३६ वर संपर्क साधावा, असेही विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment