31 May, 2026

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


• जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का 


हिंगोली, दि.३१ (जिमाका): जिल्ह्यातील काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून, या घटनेची नोंद भूकंप मापन केंद्रामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेची झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. 



जिल्हा प्रशासनामार्फत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी तसेच कोणतीही आपत्कालीन माहिती प्राप्त झाल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

*****

No comments: