12 June, 2024

'बकरी ईद' दिवशी गोवंशाची कत्तल होणार नाही, यासाठी उपाययोजना करा- जिल्हाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिल्ह्यात बकरी ईद सणाच्या दिवशी (दि. 17) जिल्ह्यात कोठेही गायीची (गोवंशाची) कत्तल होणार नाही यासाठी जिल्हांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद हद्दीतील सर्व यात्रा, धार्मिक स्थळी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास तसेच धार्मिकतेच्या नावावर पशुबळी देण्यास प्रतिबंध व योग्य ते समुचित उपाययोजना कराव्यात. तसेच आपल्या अखत्यारीत असलेल्या परिक्षेत्रात सुरु असलेल्या बेकायदेशीर व अवैध धार्मिक यात्रेतील पशुबळी कायमस्वरुपी बंद करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व महाराष्ट्र प्राणी (सुधारण) रक्षण अधिनियम 1995 च्या कलम 5 अन्वये संबंधित यंत्रणेला दिले आहेत. *****

No comments: