- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
- ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण
हिंगोली, दि. १९ (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ८९ हजार ७६९ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. यापैकी ४३ हजार ५२५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांपैकी ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून ९ हजार ५९९ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
योजनेच्या जिल्हास्तरीय प्रक्रियेंतर्गत कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निश्चिती करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment