25 February, 2020



महिला व बालविकास विभागामार्फत जनजागृती कार्यक्रम संपन्न
                                                                                                   
        हिंगोली,दि.25: जिल्हा महिला व बालविकास विभागातंर्गत, जिल्हा बालसंरक्षण कक्ष हिंगोली, यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी असलेल्या शासकीय योजना व जिल्ह्यामध्ये बालकांसाठी काम करणाऱ्या यंत्रणा यांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी जनजागृती कार्यक्रम संप्पन झाला.
प्रत्येक गाव पातळीवर बालकासाठी गाव बालसंरक्षण समिती असून या समितीमार्फत काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांचे पुनर्वसन केले जाते. तसेच अशा बालकांसाठी बालसंगोपन संस्था व बालसंगोपन योजना कार्यान्वित आहेत. अनाथ असलेल्या बालकांना शिक्षण व नोकरीमध्ये 1% (टक्का) आरक्षण आहे अशी माहिती या जनजागृती कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांनी यावेळी दिली.
समुपदेशक सचिन पठाडे यांनी यावेळी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा असून असे केल्यास २ वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रुपये १ लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ नुसार १२ वर्षाच्या आतील बालकांवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला फाशीची शिक्षा, तसेच १६ वर्षावरील  बालकांवर बलात्कार केल्यास कमीत कमी १० वर्ष ते २० वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती दिली. जिल्ह्यातील काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी पालकांनी बालकल्याण समिती सावरकर नगर, हिंगोली येथे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांनी केले.  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहिती विश्लेषक शेख रफिक व क्षेत्र कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत यांनी सहकार्य केले.
****







No comments: