31 January, 2019

ऑनलाईन शिष्यवृत्ती अदायगीची प्रक्रीया पूर्ण करण्याकरिता पूर्तता करण्याचे आवाहन




ऑनलाईन शिष्यवृत्ती अदायगीची प्रक्रीया पूर्ण
करण्याकरिता पूर्तता करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.31: सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासुन महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकाराच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल दिनांक 1 ऑक्टोबर 2018 पासुन नव्याने कार्यान्वीत झाली असुन https://mahadbt.mahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती विजाभज,इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती/फ्रिशिप योजनेकरीता ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केलेले आहे. सदर अर्ज संबंधीत महाविद्यालयाकडुन तपासुन व पडताळणी करुन   सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली  यांचेकडे मान्यतेस्तव सादर करण्यात येत आहेत. महाविद्यालयाकडुन प्राप्त झालेल्या अर्जावर  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांच्याकडुन ऑनलाईन मान्यता देण्यात येत आहे. सदर पोर्टलवर मान्य झालेल्या अर्जाची अदायगीची प्रक्रिया यशस्वी होण्याकरीता खालील बाबीची विदयार्थ्यांच्या लॉगीनमधुन ऑनलाईन पुर्तता होणे आवश्यक आहे.
प्रणालीमधील "पेमेन्ट वाऊचर"(Payment Vaucher Details) या स्क्रीनवरील "इन्स्टीटयुट स्टेटस " (Institute Stutus) " स्टुडंट स्टेटस " (Student Status) हे पहिल्या First Installment सत्राकरीता "apporved"  म्हणजेच मान्यता दर्शविली असल्यास आपणास  "Redeem " हे बटण सक्रिय/ ॲक्टीव झालेले दिसेल. वरील स्क्रीन मध्ये विद्यार्थी व महाविद्यालय यांना मान्य झालेल्या रक्कमा दर्शविण्यात येत आहेत. सदर रक्कमा या संबंधीत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर तसेच संबंधीत महाविद्यालयाच्या बँक खात्यावर वितरीत करुन घ्यावयाच्या असल्यास "Redeem "  बटण दाबणे आवश्यक आहे. या प्रक्रियेस वाऊचर जनरेशन (Vaucher Genration) असे संबोधी केले जाते.विद्यार्थ्यांच्या लॉगीनमधुन उपरोक्त 1 व 2 मध्ये नमुद केलेली ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण न केल्यास मान्य झालेली विद्यार्थी व महाविद्यालयाची शिष्यवृत्तीची रक्कम वितरण होणार नाही याची नोंद घ्यावी.विद्यार्थ्यांचे बँक खातेक्रमांक प्रणालीमध्ये अचूक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत केलेले बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. अदायगीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक स्तरावर एस.एम.एस (SMS) येणेस्तव मोबाईल क्रमांक हा आधार तसेच नोंदणीकृत बँक खात्याशी संलग्न असून तो अद्ययावत असणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत असे निदर्शनास येत आहे की, वाऊचर जनरेशन (Vaucher Genration) झालेल्या अर्ज संख्येपैकी केवळ 10% विद्यार्थ्यांनी वाऊचर रिडीमशन (Vaucher Redeemtion ) प्रक्रिया पुर्ण केलेली असून 90% विद्यार्थ्यांनी वाऊचर रिडीमशन प्रक्रिया अद्यापही केलेली नाही. सदर प्रक्रिया विद्यार्थ्यांमार्फत पूर्ण होत असल्याने विद्यार्थ्यांचे व संबंधीत महाविद्यालयाचे शिष्यवृत्तीच्या रक्कमेचे वितरण पुर्ण होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने उपरोक्त सुचना मधील प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या लॉगीन मधूनच पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे. तसेच इतर बाबी परिपुर्ण नसल्यास त्या त्वरीत करुन घेण्यात याव्यात. उपरोक्त दिलेल्या सुचनांचे पालन न केल्यास व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा न झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधीत विद्यार्थ्यांची असेल याबाबत सामाजिक न्याय विभाग / विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण विभागाची जबाबदारी राहणार नाही याची सर्व विदयार्थ्यांनी दखल घ्यावी. महाविद्यालयातील/विद्यार्थी प्रतिनिधी (UR,GS,SR) यांना उपरोक्त सूचना विविध माध्यमातुन विदयार्थ्यांना त्वरेने कळवाव्यात,असे आवाहन भाऊराव चव्हाण, सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण हिंगोली यांनी  केले आहे.
*******


30 January, 2019

निवृत्ती वेतन धारक आणि कुटूंब निवृत्ती वेतन धारकांना माहे जानेवारी 2019 पासून सातवा वेतन


निवृत्ती वेतन धारक आणि कुटूंब निवृत्ती वेतन धारकांना
माहे जानेवारी 2019 पासून सातवा वेतन

हिंगोली,दि.30: जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन धारक आणि कुटूंब निवृत्त वेतन घेणाऱ्या दि. 31 डिसेंबर, 2015 पुर्वीच्या सर्व निवृत्ती वेतन धारकांना माहे जानेवारी 2019 चे वेतन सातवा वेतन आयोगाप्रमाणे प्रदान करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी पी. डी. पुंडगे व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) बी. के. सांडभोर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****

परभणी येथील सैनिक रॅलीस जाण्याकरीता बसेसची सुविधा


परभणी येथील सैनिक रॅलीस जाण्याकरीता बसेसची सुविधा

        हिंगोली, दि.30: परभणी येथील पोलीस मुख्यालय ग्राऊंड येथे 3 फेब्रुवारी रोजी  सैनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सैनिक रॅलीस जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक व विधवांना परभणी येथे जाण्याकरिता बसस्थानक हिंगोली, कळमनुरी, सेनगाव व वसमत येथे सकाळी 7.00 वाजता बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहिती करीता नोडल अधिकारी - 9172613404, 8716924424 आणि  नोडल जे.सी.ओ. 9766081693, 7020132995 या मोबाईल नंबरवर संपर्क करावा असे सैनिक कल्याण कक्षाने कळविले आहे.
****

29 January, 2019

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची योग्य अंमलबजावणी करावी -रत्नाकर गायकवाड



ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची योग्य अंमलबजावणी करावी
-रत्नाकर गायकवाड
हिंगोली,दि.29: ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातंर्गत  गावांचा विकास करतांना गाव निहाय विकास आरखडा तयार करण्यात आला असून त्यानुसारच या अभियानात समाविष्ट गावांचा विकास करण्यासाठी या अभियानाची योग्य अंमलबजावणी करण्याचे निर्देश ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर गायकवाड यांनी दिले.
सोमवार (दि.28) रोजी जिल्हाधिकारी नांदेड येथील डी.पी.सी. सभागृहात आयोजित नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत आढावा बैठकीत श्री. गायकवाड बोलत होते. यावेळी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, नांदेड जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी तुम्मोड,  नांदेड जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, धनजंय माळी, दिलीप बायस, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश‍ मिणियार यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. गायकवाड म्हणाले की,  महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात काम करतांना दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. या अभियानात समाविष्ट गावातील प्रत्येक मुल शाळेत, प्रत्येक मुल शिकलेले  आणि प्रत्येक शाळा सुंदर असायला पाहिजे. या गावातील शेतकऱ्यांना गट शेती मध्ये समाविष्ट करुन सर्वाना पीक कर्ज मिळाले पाहिजे. तसेच ज्या गावांचा वॉटर बजेट झाला नसले त्या गावांचा 15 दिवसात वॉटर बजेट तयार करुन सादर करावा. तसेच या गावातील मंजूर घरुकुलांसाठी लागणारी पाच ब्रास वाळू झीरो रॉयल्टीवर उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ही तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांची आहे. गावातील व्यसनमुक्ती आणि कुटुंब नियोजन यासारख्या सामाजिक निदेर्शांचेही पालन करावे. तसेच या अभियानात समाविष्ट सर्व गावांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून, या निधीद्वारे विकास कामे करावीत. गावातील रोजगारक्षम व्यक्तींना रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण देवून प्रत्येक कुटुंबाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. समाविष्ट गावांनी  गाव रस्त्याच्या दोन्ही बाजूस  वृक्षारोपण करावे असे ही श्री. गायकवाड यावेळी म्हणाले.
जिल्हा पातळीवरील यंत्रणा, गाव पातळीवरील यंत्रणा आणि ग्रामप्रवर्तक यांच्या समन्वयातून समाविष्ट गावात गाव मुक्काम करुन या गावातील ग्रामस्थांकडून समस्या जाणुन घेत त्या सोडविल्यास गावांचा विकास साधणे सहज शक्य असल्याचे अभियानाचे कार्यकारी संचालक उमाकांत दांगट यावेळी म्हणाले.
यावेळी श्री. गायकवाड यांनी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा आढावा घेत या अभियानात समाविष्ट गावातील सरपंच आणि ग्रामप्रवर्तक यांच्या संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या           
यावेळी आढावा बैठकीस संबंधीत विभागाचे अधिकारी, ग्रामप्रवर्तक आणि सरपंच यांची उपस्थिती होती.
****


जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे 31 जानेवारी रोजी आयोजन


जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे 31 जानेवारी रोजी आयोजन

         हिंगोली, दि.29: येणाऱ्या 31 जानेवारी रोजी सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, येथील बहुविध जिल्हा प्रशाला मैदान, हिंगोली येथे सकाळी 9.00 वाजता  स्पर्धेची सुरुवात होणार आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांचे वय वर्षे 16 ते 30 या वयोगटातील असणे आवश्क आहे. स्पर्धेचा कोड नंबर मिळविण्यासाठी स्पर्धकांनी आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच वरील दिलेल्या वेळेवर हजर राहणे बंधनकारक आहे. स्पर्धा सुरु झाल्यानंतर स्पर्धकाला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वत: स्वखर्चाने आणावयाचे आहे. सदरची स्पर्धा जिल्हास्तरीय असल्याने जिल्ह्यातील कोणत्याही 16 ते 30 या वयोगटातील युवक व युवती स्पर्धेत भाग घेऊ शकणार असून परीक्षण समितीचा निकाल हा अंतिम मानला जाणार आहे. विजेत्या स्पर्धकांना युवक गटात  प्रथक क्रमांक 1000 रुपये व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक 700 रुपये व प्रशस्तीपत्र आणि तृतीय क्रमांक 500 रुपये व प्रशस्तीपत्र तर युवती गट प्रथक क्रमांक 1000 रुपये व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक 700 रुपये व प्रशस्तीपत्र आणि तृतीय क्रमांक 500 रुपये व प्रशस्तीपत्र असे बक्षीसे देण्यात येणार आहेत.
तरी जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास यांनी केलेआहे.
****

बाल विवाह प्रतिबंधात्मक कायद्याची जनजागृती करावी


बाल विवाह प्रतिबंधात्मक कायद्याची जनजागृती करावी
         हिंगोली, दि.29:  राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने भारतातील  बाल विवाह घटना सदंर्भात प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार बाल विवाहाच्या सर्वात जास्त घटना घडलेल्या भारतातील 70 जिल्ह्यांमध्ये तर महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांचा समावेश आढळुन येत आहे. या संदर्भात शासनाने राज्यातील बाल विवाहास प्रतिबंध करण्याकरिता ग्राम पातळीवर ग्राम सेवक यांना आणि शहर पातळीवर बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना बाल विवाह प्रतिबंध अधिकारी म्हणुन घोषित करण्यात आले आहे. परंतू एकंदरीत राज्याची परिस्थितीचा  विचार करता बाल विवाह प्रतिबंधासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार दि.24 जानेवारी, 2019 रोजी बैठक अध्यक्ष बाल विवाह प्रतिबंध समिती तथा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीस उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे,तहसिलदार गजानन शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉ.मोहन आ.कौसडीकर, महिला सहाय्यक कक्ष उज्वला वगेवार सुनिता शिंदे, जि.प.शिक्षण विभाग मोहन जोशी, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील मुख्यसेवीका आर. पी.पडोळे, बाल कल्याण समिती सदस्य  जया दे.करडेकर,  प्रा.विक्रम जावळे, ॲड. संभाजी माने, प्रा.यु.एच.बलखंडे, मुलींचे निरीक्षणगृह अधिक्षक चंपती घ्यार आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  व्हि जी.शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.
            यावेळी श्री. जयवंशी म्हणाले की, सर्व धर्मांच्या विवाह स्थळांच्या प्रमुखांनी  विवाहास जागा उपलब्ध करुन देण्यापुर्वी मुला-मुलींचे वयाचे दाखले पाहणे हे बाल विवाह प्रतिबंधसाठी आवश्यक आहेत अशा सुचना देण्यात आल्या. बाल विवाह रोखण्याकरीता मदत व्हावी यासाठी सर्व विभाग प्रमुखांना बाल विवाह प्रतिबंध बाबतचा शासन निर्णय पुरविण्यात यावा. तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयीन बैठकीत शासन निर्णय / परिपत्रकाचे वाचन करणे.
           बाल विवाह प्रतिबंधासाठी पोलीस विभागाची भुमिका अत्यंत महत्वाची असून त्याकरीता पोलीस विभागातंर्गत या संदर्भात बैठकी होणे महत्वाचे आहे. तसेच ग्राम पातळीवर प्रत्येक ग्रामसभेच्या बैठकीमध्ये शासन परीपत्रक वाचन व शिक्षेचे स्वरुप याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे. गावातील महत्वाचा घटक म्हणुन ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी गावात बाल विवाह होणार नाही याकरीता जातीने लक्ष देणे महत्वाचे आहे. तसेच बाल विवाह प्रतिबंध करण्याकरीता सार्वजनिक उपक्रमात याविषयाची प्रचार, प्रसिध्दी व जाणीव जागृती करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी  दिले.  बालविवाह प्रतिबंध होण्याच्या दृष्टीकोनातुन समितीतील सदस्यांची भुमिका अत्यंत महत्वाची आहे.तसेच जनतेने देखील बालविवाह प्रतिबंधाबाबत जागृत असणे महत्वाचे असल्याचे श्री जयवंशी यावेळी म्हणाले.

****

गरजू रुग्णांवर महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून होणार अद्ययावत उपचार - जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी





गरजू रुग्णांवर महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून होणार अद्ययावत उपचार
- जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी

·   जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांना महाआरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन
·   अटल महाआरोग्य शिबीराचे 10 फेब्रूवारी रोजी हिंगोलीत आयोजन

हिंगोली, दि.29 :  येणाऱ्या 10 फेब्रूवारी रोजी हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशनजवळ जिल्ह्यातील विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर विनामुल्य अद्ययावत उपचार करण्यासाठी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहामध्ये श्री. जयवंशी यांनी महाआरोग्य शिबीराच्या आयोजना संदर्भात विविध यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकूळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार,  जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के, गजानन घुगे, रामेश्वर नाईक, संदीप जाधव यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वसामान्य गरजू रूग्णांना सर्व रोग निदान व उपचार एकाच ठिकाणी व मोफत उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी हे महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या संधीचा लाभ आपल्या परिसरातील गरजू रूग्णांना चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यर्त्यांनी प्रयत्न करावेत.

महाआरोग्य शिबीरापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत आणि शहराच्या प्रत्येक प्रभागात ज्या नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या आहेत अशा रुग्णांची आजपासून 2 फेब्रूवारी पर्यंत माहिती संकलीत करण्यात येणार आहे. तसेच सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर 3 ते 9 फेब्रूवारी या कालावधीत अटल महाआरोग्य सप्ताह राबवून सर्व रुग्णांची त्यांच्या नजीकच्या आरोग्य केंद्रात पूर्व तपासणी करण्यात येणार आहे आणि 10 फेब्रूवारी रोजी हिंगोली येथील रेल्वे स्टेशन जवळ आयोजित करण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबीरात या रुग्णांवर नामांकित डॉक्टरामार्फत उपचार केले जाणार आहेत. या आरोग्य शिबीरात ज्यांच्यावर उपचार करणे शक्य नाही, अशा रुग्णांना नागपूर, नांदेड, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे नेवून त्यांच्यावर अत्याधूनिक  पध्दतीचे उपचार केले जाणार आहेत. महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच समाजातील दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यांच्यासह शहरातील इतर मोठी दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, इंडियन मेडिकल असोसिएशन यांचे प्रतिनिधी, इतर पॅथींच्या संघटनांचे प्रतिनिधी यात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील दूर्धर आजारांनी ग्रस्त आणि आदिवासी भागातील गरजू रुग्णांना खऱ्या अर्थाने चांगले उपचार मिळण्यासाठी या शिबिराचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करुन सर्व यंत्रणांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या महाआरोग्य शिबिरासाठी राज्यातील नामवंत डॉक्टर्स उपस्थित राहून ते स्वत: याठिकाणी गरजू रुग्णांवर उपचार करणार आहेत.
गाव व तालुका पातळीवर आरोग्य यंत्रणांनी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत नियोजन करुन रुग्णांची माहिती जिल्हा यंत्रणेकडे पाठवावी. नगरपालिका नगर पंचायत क्षेत्रातील विविध प्रभागातील अशा गरजू नागरिकांची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संकलीत करुन त्यांना या महाआरोग्य शिबीरात उपचार मिळतील यासाठी प्रयत्न करावे. तसेच शासन, प्रशासन, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटल्स, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, वैद्यकीय संघटना, सामाजिक संघटना आदींनी हे महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी समन्वयाने सुयोग्य नियोजन करावे, असे आवाहन यावेळी श्री. जयवंशी यांनी केले.

प्रत्येक रूग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. गोरगरीब रूग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे महागडे उपचार घेणे शक्य नसते. अशा सर्व रूग्णांना या शिबिरात विनामूल्य सर्व प्रकारचे उपचार व जगप्रसिद्ध नामवंत व तज्‍ज्ञ डॉक्टर्सकडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य कायर्कर्ता म्हणून आपल्या परिसरातील एकही गरजू रूग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करावे असे संयोजक रामेश्वर नाईक म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अधिकाधिक नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुम्मोड यांनी यावेळी सांगितले. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.
यावेळी आढावा बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

****

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -2018 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन



राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -2018 साठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 29:राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 28फेब्रुवारी 2019 असा आहे.
            स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा  www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.  
पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे
अ.क्र
पुरस्काराचेनाव
पारितोषिक
1
बाळशास्त्रीजांभेकरपुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजाररुपये (मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
2
अनंतगोपाळशेवडेपुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
3
बाबूरावविष्णूपराडकरपुरस्कार(हिंदी) (राज्यस्तर)
51हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
4
मौलानाअबुलकलामआझादपुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)
51हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
5
यशवंतरावचव्हाणपुरस्कारशासकीयगट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
6
पु.ल.देशपांडेउत्कृष्टदूरचित्रवाणीवृत्तकथापुरस्कार(राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
7
तोलारामकुकरेजाउत्कृष्टवृत्तपत्रछायाचित्रकारपुरस्कार (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
8
केकीमूसउत्कृष्टछायाचित्रकारपुरस्कारशासकीयगट (मा.वज.) (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
9
सोशल मीडिया पुरस्कार(राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
10
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्य स्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
11
पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार
12
दादासाहेबपोतनीसपुरस्कार,
नाशिकविभाग

51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र,याव्यतिरिक्तरुपये 10 हजारदै.गावकरीनेपुरस्कृतकेलेआहेत.)
13
अनंतरावभालेरावपुरस्कार,
औरंगाबादविभाग (लातूरसह)
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
14

आचार्यअत्रेपुरस्कार,
मुंबईविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
15
नानासाहेबपरूळेकरपुरस्कार,
पुणेविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
16
शि.म.परांजपेपुरस्कार,
कोकणविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
17
ग.गो.जाधवपुरस्कार,
कोल्हापूरविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
18
लोकनायकबापूजीअणेपुरस्कार,
अमरावतीविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
19
ग.त्र्यं.माडखोलकरपुरस्कार,
नागपूरविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
       
नियम व अटी
राज्य/विभागीय पुरस्कार
        पुरस्कारांसाठी पत्रकारांचीमागील 5 वर्षांचीकामगिरी, त्यांचीसामाजिकबांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरीयाचाही विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पध्दतीने केली जाईल. या स्पर्धेत     फक्त मराठी भाषेसाठी राज्यव विभागीयस्तर आहेत.इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच सोशल मीडिया पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            पुरस्कारासाठी पाठवावयाच्याप्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतींसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिका तहालेख प्रसिध्द झाला असेल,त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखलाजोडलेल्याप्रवेशिकांचाचविचारकेलाजाईल.
पत्रकारांच्यातसेचवृत्तपत्रछायाचित्रकारांच्यागटातभागघेणाऱ्यास्पर्धकांनीशासनअथवाशासकीयमहामंडळाच्यासेवेतनसल्याचेप्रतिज्ञापत्रप्रवेशिकेसोबतजोडणेआवश्यकआहे.
            अर्जदारानेराज्यवविभागीयपातळीवरीलप्रवेशिकानागपूरआणिऔरंगाबादयेथीलसंचालक(माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकणविभागयेथीलविभागीयउपसंचालक(माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राचीआवश्यकतानाही.
मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू याचा रहीभाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कार पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया तर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना,स्पर्धा वस्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.
            ज्यानियतकालिकांचाखप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशा नियतकालिकांतील मजकूर प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
            जे पत्रकार बृहन्मुंबई, नवीमुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भागघेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिध्द झाले . असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.
            गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात पाठविता येतील.
            शासकीयगटातीलस्पर्धेसाठीएकचप्रवेशिकापाठविण्याचीमुभाराहील.प्रवेशिकासंबंधितविभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना  व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात पाठवाव्या लागतील.
       2018 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.
            प्रवेशिका राज्यस्तरासाठी किंवा विभागीय स्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यातयेईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
            प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एका पेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणा रनाही.
सोशल मीडिया पुरस्कार
            ही स्पर्धा संकेत स्थळावर ब्लॉग व सोशल मिडीयातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्त/पत्रकारिता विषयकमजकुरासाठीआहे. यास्पर्धेसाठीसंकेतस्थळेवब्लॉगसोशलमीडियाचा वृत्त/पत्रकारिताविषयक प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल. पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. स्वतंत्र ब्लॉगद्वारे लेखन केलेले असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष झालेले असावे. त्याचप्रमाणे, वृत्त/पत्रकारिताविषयक संकेतस्थळ अधिकृत असावे व त्यावर सोशल मीडिया वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका या विकास पत्रकारिताविषयक लेखनाच्या असाव्यात व त्यात शासनाच्या विविध योजनांना पूरक अभिव्यक्ती असावी. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी सोशल मीडियाद्वारे करण्यात आलेल्या पत्रकारितेची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रित प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात. नियमातील संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार
            केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान आणि राज्य शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लिखाणातून लोकांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लिखाण करणाऱ्या पत्रकारांना तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधील पत्रकारांना सहभागी होता येईल. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव योजना, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅसची तसेच वीजेची निर्मिती इत्यादी बाबत लिखाण केलेले असावे. शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छताविषयक विविध योजनांची प्रसिध्दी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी  लिखाणाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन इत्यादींचा या पुरस्कार स्पर्धेत अंतर्भाव होईल. नियमातील संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा
        इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी  वृत्तकथा पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था  प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
            प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपंसचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला,  हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तचित्रकथा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्याची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती  करण्यात येईल. तसेच याशिवाय अन्य संबंधित अटी  या गटासाठीही लागू राहतील.     
                                छायाचित्रकार पुरस्कार
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्ण वेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी ठरतील अशी छायाचित्रे यांच्या सहप्रवेशिका सादर करता येईल.
            महाराष्ट्रशासनाच्याविविधलोकोपयोगीयोजनांवरीलछायाचित्रग्राह्यमानण्यातयेईल. मात्रहेछायाचित्र मूळस्वरुपातीलअसावे. फोटोप्रतनसावी. पुरस्कारासाठीछायाचित्रकारांची मागील 5 वर्षाचीकामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयककामाच्याप्रसिध्दीसाठीजनतेमधीलजाणिव जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. एकाच छायाचित्रकारालासलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. पुरस्कारासाठीच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्यानियतकालिकातछायाचित्रप्रसिध्दझालेअसेल, त्यानियतकालिकाच्यासंपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथात्याप्रवेशिकेचा विचारकेलाजाणारनाही.
केकीमूसउत्कृष्टछायाचित्रकारपुरस्कार, शासकीयगट (मावज)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
उपरोक्त सर्व स्पर्धा विषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथे उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावती व संचालक, औरंगाबाद, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्लीआणि वृत्तशाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामामार्ग, मंत्रालय, मुंबई -32 येथे उपलब्ध आहेत.
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालया च्या वतीने करण्यात येत आहे.
पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार
            ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोअीफोडे यांनी त्यांच्या लेखणीद्वारे समाजातील अनिष्ट प्रथा आणि अंधश्रध्दा यावर सातत्याने आसूड ओढले.
            उत्कृष्ट अग्रलेखांबद्दल संपादकांच काम करणारे ज्येष्ठ पत्रकार/संपादक आणि प्रभावी अग्रलेखाद्वारे प्रभावी सामाजिक जाणिव जागृती करणारे संपादक म्हणून सुधाकर डोअीफोडे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. विविध विकास कामांची विशेषत: शासकीय विकास कामांची त्यांनी सकारात्मक प्रसिद्धी केली. त्यांच्या नावे विकास कामांची दखल घेऊन त्याचे महत्व जनसामान्यांपर्यंत प्रभाविरित्या आपल्या संपादकीयाद्वारे पोहचवणाऱ्या पत्रकार/संपादकांना हा पुरस्कार देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकीयांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे.
प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे हे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.
इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.
०००