26 July, 2022

 

कारगील विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन




 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कारगील विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शहिदांना अभिवादन केले.   

यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुजित जाधवर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, माजी सैनिक सुरेश भालेराव, बसरुध्दीन शेख, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील संजय केवटे, कल्याण संघटक उत्तमराम लेकुळे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी मौन पाळून शहिदांना श्रध्दांजली वाहिली. तसेच शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*****

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 567 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 5.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 566.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 65.93 टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 26 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 6.50 (591.20) मि.मी., कळमनुरी 13.40 (680.10) मि.मी., वसमत 1.90 (580.60) मि.मी., औंढा नागनाथ 2.90 (518.50) मि.मी, सेनगांव 0.30 (441.70) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 566.70 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******

25 July, 2022

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण निश्चित करण्यासाठी

28 जुलै रोजी सभेचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम-12 उपकलम (1), कलम 58 (1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 1996 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रियांच्या आरक्षणांसह ) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्यासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करुन त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला आहे.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आरक्षण निश्चित करण्यासाठी दि 28 जुलै, 2022 रोजी सकाळी 11-00 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली  जिल्हा परिषदेसाठी  जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव पंचायत समितीसाठी संबंधित तहसील कार्यालयात व वसमत पंचायत समितीसाठी वसमत येथील पंचायत समिती सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद  अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची  आरक्षण निश्चितीच्या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी दिलेल्या वेळेत हजर राहावे.

जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या आरक्षणाचे प्रारुप दि. 29 जुलै, 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना दि. 29 जुलै ते 02 ऑगस्ट, 2022 या कालावधीत सादर करता येतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी

31 जुलैपर्यंत बँक खाती आधार संलग्न करावेत

 

हिंगोली (जिमाका),  दि. 25 :  प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी  करण्यासाठी  विशेष जनजागृती मोहिम राबवून दि. 31 मे, 2022  पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना होत्या. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.

सद्यस्थितीत दि. 7 जुलै, 2022 अखेर राज्यातील आधार प्रमाणित 106.68 लाख लाभार्थ्यांपैकी 60.35 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित 46.44 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित आहे. याबाबत केंद्र शासनाने दूरचित्रवाणी परिषदेमार्फत राज्यातील प्रलंबित ई-केवायसी दि. 31 जुलै, 2022 अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण होणार नाही त्यांना पुढील हप्त्याचे वितरण करण्यात येणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित वेळेत दि. 31 जुलै, 2022 अखेर पर्यंत ई-केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

******

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 562 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 5.90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 561.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 65.33 टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 25 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 5.70 (584.70) मि.मी., कळमनुरी 8.40 (666.70) मि.मी., वसमत 5.80 (578.70) मि.मी., औंढा नागनाथ 6.00 (515.60) मि.मी, सेनगांव 3.60 (441.40) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 561.60 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******

 

23 July, 2022

 

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन

 

 


हिंगोली, (जिमाका) दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी मिलींद वाकळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

******

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 542 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 6.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 541.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 63.02  टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 23 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 6.60 (567.40) मि.मी., कळमनुरी 9.20 (647.50) मि.मी., वसमत 6.50 (553.90) मि.मी., औंढा नागनाथ 6.20 (492.50) मि.मी, सेनगांव 3.30 (425.60) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 541.70 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

*****