25 July, 2022

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी

31 जुलैपर्यंत बँक खाती आधार संलग्न करावेत

 

हिंगोली (जिमाका),  दि. 25 :  प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी  करण्यासाठी  विशेष जनजागृती मोहिम राबवून दि. 31 मे, 2022  पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना होत्या. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.

सद्यस्थितीत दि. 7 जुलै, 2022 अखेर राज्यातील आधार प्रमाणित 106.68 लाख लाभार्थ्यांपैकी 60.35 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित 46.44 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित आहे. याबाबत केंद्र शासनाने दूरचित्रवाणी परिषदेमार्फत राज्यातील प्रलंबित ई-केवायसी दि. 31 जुलै, 2022 अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण होणार नाही त्यांना पुढील हप्त्याचे वितरण करण्यात येणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित वेळेत दि. 31 जुलै, 2022 अखेर पर्यंत ई-केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

******

No comments: