09 July, 2022

 

पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून

त्यांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था करा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

 

हिंगोली, (जिमाका)  दि . 9 : जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना सुरक्षीत स्थळी हलवून त्यांच्या राहण्याची ,जेवण्याची , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोबाईलवरुन जिल्हाधिकारी यांना दिले .  

असना नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गावाला पाण्याने वेढले होते . दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वत: दिल्लीवरुन हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन कार्यवाहीचे आदेश दिले .

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची , राहण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. काही मदत लागल्यास तात्काळ स्वत: कळवावे, असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

*****

No comments: