12 July, 2022

 

कोविड-19 आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी

सानुग्रह सहाय्यासाठी बँकेची माहिती द्यावी

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 12 : शासनाने कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य वितरीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या सानुग्रह अनुदानासाठी संबंधित व्यक्तींनी शासनाने विकसित केलेल्या mahacovid19relief.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार अर्जदारांनी ऑनलाइन संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर केलेले आहेत. परंतु अद्याप काही अर्जदारांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य मिळाले नाही अशा नागरिकांच्या बँक खात्याची माहिती मंत्रालय स्तरावरुन मागविण्यात आली आहे.

            ज्या अर्जदाराना अद्याप 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य प्राप्त झाले नाही अशा अर्जदारांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे बँक खात्याच्या माहितीसह उपस्थित राहावेत, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

******  

 

No comments: