22 July, 2022

 

हिंगोली जिल्ह्यातील 40 बेचिराख गावांना पिक विमा भरण्यासाठी पोर्टलवरील अडचणीचे निराकरण

 

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा

-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 22 : प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 40 बेचिराख गावांचा सातबारा व आठ अ यांचे पिक विमा पोर्टलवर पडताळणी (Verification) होत नसल्याने शेतकऱ्यांना पिक विम्याचा हप्ता भरण्यासाठी अडचण येत होती. या समस्येचे राज्यस्तरावरुन निराकरण झालेले आहे.

या 40 बेचिराख गावातील सातबारा व आठ अ ची पिक विमा पोर्टलवर पडताळणी (Verification) होत आहे. त्यामुळे या गावातील तसेच इतर गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

******  

No comments: