16 February, 2017

विवाह मंडळ व विवाह यांची नोंदणी करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 16 :- महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनयिमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 व महाराष्ट्र मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी विभाग, 1999 यास अनुसरून राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील अस्तित्वात असलेल्या येणाऱ्या विवाह मंडळांनी विवाह मंडळ चालवू इच्छिणारी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीचा गट किंवा वधू-वर सूचक वेबसाईटस अशा विवाह मंडळ नोंदणी आपल्या कार्यक्षेत्रातील निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांचेकडे नोंदविणे वैज्ञानिक कलम 5 (1) अनुसार बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे विवाह नोंदणी देखील कलम 6 (1) नुसार विवाह झालेला पक्षकार (वधु-वर) यांनी 3 साक्षीदारासह वर किंवा वधू ज्या ठिकाणी राहतात, त्या कोणत्याही एका ठिकाणच्या निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांचेकडे व्यक्तीश: उपस्थित राहून त्यांचे विवाह नोंदणी करावयाचे आहे.
सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी दि. 14 फेब्रुवारी, 2006 रोजी दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक विवाहांची नोंदणी करणे बंधनकारक केलेली आहे. तसेच उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडे दाखल विवाह नोंदणीबाबतच्या याचिका PIL 52/2013 संदर्भात विवाह मंडळांची नोंदणी करणे अनिवार्य केलेली आहे.
महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनयिमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 व महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी विभाग, 1999 ची प्रत राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे igrmaharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विवाह मंडळांच्या नोंदणीची नियमावली, अर्जाचे नमुने, भरावयाची फीस इत्यादी सविस्तर माहिती व महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी विहीत वेळेत केली नसल्यास, अधिनियमातील कलम 12 (2) वैधानिक तरतूदीनुसार त्यांचेवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
विवाह मंडळ चालविणाऱ्या व्यक्तींनी त्यांचे विवाह मंडळाची नोंदणी व पक्षकारांची (वधु-वर) त्यांच्या विवाहाची नोंदणी संबंधित क्षेत्रातील, निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांचेकडे विनाविलंब करून घ्यावी.
याव्दारे आम जनतेस सूचित करण्यात येते की, विवाह मंडळाची नोंदणी तसेच झालेल्या विवाहांची नोंदणी करून घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांचेशी अपेक्षित कागदपत्रासह संपर्क साधावा व नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.
कसुरदार पक्षकार (वधु-वर) अथवा विवाह मंडळ यांचेवर विवाह मंडळाचे नियिमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 मधील तरतुदीचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची कृपया नोंदणी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

1 comment:

,अनिरूध्द कार्येकर said...

आतापर्यंत किती विवाहांची नोंद झाली ?? १९६० ते २०२१पुणे विभागात ?