‘पंतप्रधान
किसान सन्मान निधी’ योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
-
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली दि.24 :- शेतकरी कुटुंबांना
आत्मसन्मानाने जगण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अत्यंत महत्वाची असून
जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी केले.
यावेळी अप्पर
जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपविभागीय
अधिकारी अतुल चोरमारे, कृषि उपसंचालक एस. व्ही. लाडके, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
विजय लोखंडे, उपविभागीय कृषि अधिकारी बळीराम कच्छवे, तहसिलदार गजानन शिंदे, तालुका
कृषि अधिकारी श्री. सतिश सावंत व शेतकरी बांधवांची मोठ्या
प्रमाणावर प्रमुख उपस्थिती होती.
उत्तर प्रदेशातील
गोरखपुर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा राष्ट्रव्यापी
शुभारंभ केला. त्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन समिती, सभागृह येथे
करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील 10 लाभार्थ्यांचा शाल, श्रीफळ देवून
सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात उपविभागीय
कृषी अधिकारी बळीराम कच्छवे यांनी या योजनेसाठी लागणारी लाभार्थींची पात्रता,
स्थापन केलेल्या समित्या, पात्र यादी इत्यादी विषयी पॉवर पॉईंट प्रझेन्टेशनद्वारे
सविस्तर माहिती सादर केली.
00000
No comments:
Post a Comment