15 October, 2019

वाचनामुळे व्यक्तिमत्व समृध्द : जिल्हाधिकारी


वाचनामुळे व्यक्तिमत्व
समृध्द : जिल्हाधिकारी

          हिंगोली, दि. 15 : दररोज किमान दहा मिनिटे वाचन करा. वाचनामुळे मानवाचे व्यक्तिमत्व समृध्द होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे केले.
            माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त आज वाचन प्रेरणा दिन आयोजित केला गेला. जिल्हा प्रशासनातर्फे डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
            यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****

No comments: