07 February, 2018

बालकामगार मुलांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी
इच्छूक संस्थेने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

            हिंगोली, दि.7 :  बालकामगार ही एक सामाजीक अनिष्ठ प्रथा आहे. बालमजुरीमुळे बालकांच्या शारिरीक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच त्यांना शिक्षणापासुन कायमचे वंचित रहावे लागते. यामुळे अशा बालकांचे भविष्य अंध:कारमय होते. अकुशल कामाच्या पर्यायाने दारिद्र्याच्या विळख्यात अडकुन पडते. भविष्य घडविण्याच्या वयात कामात अडकल्याने शिक्षणाअभावी उज्वल भवितव्याच्या संधी त्यांना दुरापास्त होतात. हे टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात बालकामगार क्षेत्रात कार्य करण्याचा अनुभव असलेल्या अशा सेवाभावी संस्थेच्यवतीने बालकामगार मुलांचे सर्वेक्षण दि. 15 ते 25 फेब्रुवारी, 2018 या कालावधीत करण्याचे आयोजन केले आहे.
तरी इच्छुक सेवाभावी संस्थेने सरकारी कामगार अधिकारी कार्यालय डी.आर.टी.पलटण हिंगोली येथे संपर्क साधुन सर्वेक्षणासाठी लागणारे फॉर्मस व जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या सहीचे बालकामगार कामावर ठेवणार नाही असे हमी पत्र या कार्यालयातुन पुरवठा करण्यात येईल, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी केले आहे.

***** 

No comments: