29 March, 2019

शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी 31 मार्च रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया जिल्ह्यातील सर्व शाखा सुरु राहणार




शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी 31 मार्च
रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया जिल्ह्यातील सर्व शाखा सुरु राहणार

हिंगोली, दि.29:महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड एक मधील नियम क्रमांक 409 अन्वये दिनांक 31 मार्च, 2019 रोजी शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीने सदर दिवशी स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या शाखा हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव व स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र शाखा औंढा नागनाथ दिनांक 31 मार्च, 2019 रोजी उशिरा रात्री 23.00 वाजे पर्यंतचे शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी चालू ठेवावीत. तसेच दिनांक 30 मार्च, 2019 रोजी रात्री उशिरा 23.00 वाजेपर्यंत शासनाचे रोखीच व्यवहार पूर्ण करण्यासाठीचे आदेश रद्द समजण्यात यावेत, असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****

No comments: