23 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 16 रुग्ण ; तर 25 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 

·  194 रुग्णांवर उपचार सुरु

         हिंगोली,दि. 23 : जिल्ह्यात 16 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 05 व्यक्ती, वसमत परिसर 01 व्यक्ती व कळमनुरी परिसर 03 व्यक्ती  तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 05 व्यक्ती व कळमनुरी परिसर 02 व्यक्ती असे एकूण 16 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 25 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 10 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 02 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 12 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 29 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 788 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 194 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 47 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

No comments: