07 October, 2020

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

 

 हिंगोली, दि. 7 : जिल्ह्यात दि. 10 ते 13 ऑक्टोबर, 2020 या चार दिवसाच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह पाऊस पडून अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

        सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारीची काढणी सुरु आहे. या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आवश्यक ती काढणी व मळणीचे कामे पूर्ण करुन घ्यावीत. या कामी वेळ लागत असल्यास कापणी केलेल्या सोयाबीनची गंजी उंचीच्या ठिकाणी ताडपत्रीने झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. जेणेकरुन सोयाबीन पाण्याच्या संपर्कात येणार नाही व होणारे नुकसान टळेल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

 

******

No comments: