27 October, 2025

शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा




हिंगोली(जिमाका), दि. 27 : कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी बाह्यस्त्रोत संस्था मे छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व मे. महाराष्ट्र विकास ग्रुप यांना आदेश देण्यात आलेले आहेत. 
कळमनुरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत 5 आश्रमशाळा येत असून त्यापैकी 01 आश्रमशाळा ही उच्च माध्यमिक आहे. या शाळेमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक हे रिक्त पद बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहे. यासाठी एमएससी (रसायनशास्त्र) बीएड टीएआयटी स्कोअर असणे आवश्यक आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी अपर आयुक्त नाशिक व ठाणे विभागाच्या https://scsmltd.com व अपर आयुक्त अमरावती व नागपूर विभागाच्या https://mvgcompany.in या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर दि. 31 ऑक्टोबर, 2025 पर्यंत अर्ज भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन कळमनुरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.
*******

विसर्ग बंद

🟡 **🟡 *उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प* *ईसापुर धरण* जयपूर बंधा-यातून येणारा येवा निरंक झाल्यामुळे द्वार प्रचालन आराखड्या (ROS)नुसार धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने *आज दि. 27/10/2025 रोजी 20.00 वाजता ईसापूर धरण सांडव्याचे सूरू असलेले 3 गेट बंद करण्यात आले आहेत.* *सद्यस्थितीत* *इसापूर धरणाच्या सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद असून पेनगंगा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग निरंक आहे.* धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून पुन्हा गेट उघडणे,विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. *ईसापुर धरण पुरनियंत्रण कक्ष*

वैरण बियाणे मागणीसाठी पशुपालकांनी अर्ज करावेत

हिंगोली(जिमाका), दि. 27 : जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. दूध उत्पादन वाढीसाठी पुरेशा प्रमाणात पौष्टीक चारा उपलब्ध करुन देणे ही प्राथमिक गरज आहे. जनावरास पौष्टीक चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पशुपालकांना चारा उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी चारा उत्पादन कार्यक्रम हा सुधारित कार्यक्रम सन 2025-26 ते सन 2028-29 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या पशुपालकांकडे स्वत:ची शेतजमीन व सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्याकडे भारत पशुधन प्रणालीवर नोंद असलेली किमान 3 ते 4 जनावरे असणे आवश्यक आहे. वैरणीच्या उत्पादनासाठी आवश्यक खते शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खरेदी करणे आवश्यक आहे. सर्व प्रवर्गातील शेतकरी वैरण बियाणे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. वैरण बियाणे योजनेचे अर्ज ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे मागविण्यात येत आहे. त्यासाठी पशुपालकांनी https://docs.google.com/forms/d/e1FAIpQLSfMfnsAdiw5zsvudxzlKQXArn56AzV71Xm-hgmSpCH5lWJ3g/viewform?usp=header या लिंकवर दि. 15 नोव्हेंबर, 2025 पर्यंत अर्ज करावेत. ही लिंक जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून प्राप्त करुन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी केले आहे. *****

शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

हिंगोली(जिमाका), दि. 27 : कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी बाह्यस्त्रोत संस्था मे छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व मे. महाराष्ट्र विकास ग्रुप यांना आदेश देण्यात आलेले आहेत. कळमनुरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत 5 आश्रमशाळा येत असून त्यापैकी 01 आश्रमशाळा ही उच्च माध्यमिक आहे. या शाळेमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक हे रिक्त पद बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहे. यासाठी एमएससी (रसायनशास्त्र) बीएड टीएआयटी स्कोअर असणे आवश्यक आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी अपर आयुक्त नाशिक व ठाणे विभागाच्या https://scsmltd.com व अपर आयुक्त अमरावती व नागपूर विभागाच्या https://mvgcompany.in या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर दि. 31 ऑक्टोबर, 2025 पर्यंत अर्ज भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन कळमनुरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे. *******

"महादेवा" योजनेंतर्गत फुटबॉल खेळण्यासाठी सुवर्णसंधी • 13 वर्षाखालील मुला-मुलींची शुक्रवारी निवड चाचणी

हिंगोली (जिमाका), दि. 27 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ‘महादेवा’ ही योजना राज्यातील 13 वर्षाखालील मुले व मुलींच्या फुटबॉल खेळातील कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यासाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडणार आहे. जिल्हास्तरावरील निवड चाचणी, प्रादेशिक आणि अंतिम निवड फेरी, अंतिम टप्प्यात 60 मुलांची निवड सिडको, खारघर येथे आणि 60 मुलींची निवड डब्ल्यूआयएएफ कूपरेज मैदान, मुंबई येथे केली जाईल. यापैकी 30 मुले व मुलींची निवड केली जाईल आणि त्यांना पाच वर्षांची एकात्मिक शिष्यवृत्ती दिली जाईल. फुटबॉल प्रशिक्षणासोबत शैक्षणिक विकासाचाही समावेश असेल. निवड झालेल्या खेळाडूंना 14 डिसेंबर रोजी मुंबईत येणाऱ्या फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. ही योजना मित्रा, डब्ल्यूआयएफए, सिडको, व्हीएसटीएफ व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात आहे. राज्यातील फुटबॉल क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील जिल्हास्तरीय महादेवा योजनेअंतर्गत 13 वर्षाखालील मुले व मुलींच्या फुटबॉल खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता महात्मा गांधी विद्यालय, वसमत येथे करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांनी दिनांक 01 जानेवारी 2012 ते दि. 31 डिसेंबर, 2013 या कालावधीतील जन्म असलेल्या खेळाडूंना चाचणीकरीता पाठविण्याबाबत सूचना द्याव्यात. सर्व खेळाडूंनी चाचणीस्थळी येण्यापूर्वी https://forms.gle/6PAR766JoC9d2QH26 या गुगल लिंकव्दारे नोंदणी पूर्ण केल्याची खात्री करावी. खेळाडूंना त्याचे मूळ आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व क्लब व शाळांच्या मुले व मुलींनी महादेवा प्रोजेक्ट अंतर्गत जिल्हास्तर फुटबॉल निवड चाचणीत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी क्रीडाधिकारी आत्माराम बोधीकर (9561760878) यांच्याशी व फुटबॉल संघटनेचे सचिव अजगर पटेल (9175767778) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे. ***

26 October, 2025

*इसापूर धरणाचे तीन दरवाजे उघडणार*

• आज रात्री ९ वाजता पैनगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू हिंगोली, दि.२६ (जिमाका): इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे व जयपूर बंधा-यातून येणाऱ्या येव्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे आहे. त्यामुळे इसापूर धरण पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणात येणारे अतिरिक्त पाणी आज रविवारी रात्री ९ वाजता सांडव्याचे तीन दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येणार आहे. तरी पैनगंगा नदीच्या दोन्ही तिरावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर धरणाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. ******

18 October, 2025

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे १७८ कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता

• थेट खात्यावर 141 कोटी 15 लाख रुपयाचे अनुदान डीबीटीद्वारे जमा हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले असून आतापर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे १७८ कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर 1 लाख 82 हजार 498 शेतकऱ्यांच्या खात्यावर 141 कोटी 15 लाख 3 हजार 339 रुपये मदतीचे अनुदान जमा करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी 231 कोटी 27 लाख 92 हजार 335 रुपयांची मदत मंजूर केली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसीलदारांनी 2 लाख 33 हजार 4 शेतकऱ्यांना १७८ कोटी १० लाख ६४८४७ रुपयांच्या निधी वितरित करण्यासाठीची माहिती संगणक प्रणालीवर भरुन डीबीटीद्वारे निधी वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 82 हजार 498 शेतकऱ्यांच्या खात्यावर 141 कोटी 15 लाख 3 हजार 339 रुपयाची मदत डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आली आहे. ई-केवायसी प्रलंबित असलेल्या 48 हजार 539 शेतकऱ्यांना 34 कोटी 89 लाख 3 हजार 861 रुपयाची मदत ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक नोंदणी केल्यानंतर लगेच वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील 33 हजार 49 शेतकऱ्यांना 26 कोटी 95 लाख 21 हजार 322, वसमत तालुक्यातील 43 हजार 915 शेतकऱ्यांना 28 कोटी 28 लाख 34 हजार 78 रुपये, हिंगोली तालुक्यातील 32 हजार 638 शेतकऱ्यांना 25 कोटी 96 लाख 19 हजार 142 रुपये, कळमनुरी तालुक्यातील 35 हजार 258 शेतकऱ्यांना 30 कोटी 77 लाख 56 हजार 916 आणि सेनगाव तालुक्यातील 37 हजार 638 शेतकऱ्यांना 29 कोटी 17 लाख 71 हजार 881 रुपयाची मदत त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रलंबित राहिलेले 34 कोटी 89 लाख रुपयाचे अनुदान दिवाळीपूर्वी जमा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. त्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होत आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी नसणाऱ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागत आहे. त्यामुळे सर्व संबंधित शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घेऊन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. *******