21 July, 2017

भारत सरकार व सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती 2016-17 साठी मुदतवाढ
हिंगोली, दि. 21 : हिंगोली व परभणी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विनाअनुदानीत महाविद्यालय तसेच शाळेतील प्राचाय / मुख्याध्यापक / विद्यार्थ्यांनी ई-ट्रायबल (www.etribal.gov.in) संकेतस्थळावर भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रिशीपचे / सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणे करिता दि. 25 जुलै, 2017 अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यानंतर भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रिशीप / सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती पासुन वंचित राहिल्यास सर्व जबाबदारी महाविद्यालयाची राहिल. सदरील कार्यवाहीबाबत सर्व महाविद्यालयांनी सहकार्य करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *****


No comments: