01 July, 2017

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
            हिंगोली, दि. 1 : राज्याचे सामाजिक  न्याय  आणि विशेष सहाय्य, मदत   पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन, अल्पसंख्याक  विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे  पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजीत जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला.
            यावेळी पालकमंत्री कांबळे यांनी खरिप हंगाम, कर्ज वितरण , पीक पेरणी, खत व बियाणांची स्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्ज पुनर्गठन, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, डीपीडीसी अंतर्गतची विकास कामे, कृषिपंप वीज जोडणी या विषयाचा आढावा घेतला. तसेच पोलीस, जलयूक्त शिवार योजना, नगर परिषद-नगर पंचायत, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा अग्रणी बँक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक बांधकाम  आदी विभागाचा ही आढावा पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी घेतला. जिल्हा रुग्णालयाच्या हस्तांतरण तसेच सर्व विभागांनी आपआपसात समन्वय राखून कामे करावीत.
            यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, जिल्हा पूरवठा अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.


****

No comments: