15 August, 2018



पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते हिंगोली बसस्थानकाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन

        हिंगोली,दि.15: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हिंगोली येथील बसस्थानकाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन आज जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
            यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी विभाग नियंत्रक जालींदर शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, एस.टी बस ही राज्याची मुख्य जीवनवाहीनी आहे. सर्वसामान्य नागरिकरांच्या गरजा भागविणारी महत्वाचा दूवा आहे. खाजगी प्रवासी वाहतुक बसेसच्या स्पर्धा करण्यासाठी एस.टी. महामंडळाने देखील अद्ययावत बसेसची सुरुवात केली आहे. एस.टी. महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी हे अहोरात्र प्रवाशांच्या सेवेसाठी कार्य करत सदैव तत्पर असतात. हिंगोली येथे विभागीय नियंत्रक कार्यालय सुरु करण्याची मागणी आपण करणार असल्याचे ही पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            प्रास्ताविकात विभाग नियंत्रक श्री. शिरसाठ म्हणाले की, हिंगोली येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधनीकरीता 3 कोटी 80 लाख मंजूर झाले असून, सदर वास्तूचे काम दोन वर्षात पूर्ण होणार आहे. या बसस्थानकात अत्याधुनिक सोळा गाळे, प्रवाशांसाठी उपहारगृह, विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, स्वच्छता गृह, आरक्षण कक्ष, विविध वस्तु भांडार, एस.टी. महामंडळाच्या अधिकारी-कर्मचारीसाठी अद्ययावत विश्रामगृह आदी सुविधासह हे नवीन बसस्थानकाची वास्तू तयार होणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
            यावेळी आमदार श्री. मुटकुळे यांचे समयोचित भाषण झाले. प्रारंभी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
****



No comments: