10 July, 2019

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत
अर्ज सादर करण्याचे आवाहन
        हिंगोली, दि. 10 : जिल्हयातील अनु.जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेवू शकत नसलेल्या अनु.जाती  व नवबौध्द विद्यार्थ्यापैकी इयत्ता 11 वी 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामधील मुलां-मुलीप्रमाणे भोजन, निवास,शैक्षणीक साहीत्य,निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. सदर योजने अंतर्गत सन 2019 -20 करीता अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावा सदर याजने अंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांनी केले आहे.
योजनेचे निकष -  विद्यार्थी शासकीय वसतिगृहास प्रवेश घेण्यास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहीवाशी असावा, शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा,  विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा, विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल, या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनु.जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल, विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयीकृत शेडयूल्ड बँक खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे,विद्यार्थी स्थानिक रहीवाशी नसावा. (ज्या महाविद्यालय/ शैक्षणीक संस्थेत विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते महाविद्यालय, शैक्षणिक संस्था ज्या महानगर पालिका/ ग्रामपंचायत यांच्या हद्दीत आहे त्या महानगर पालीका/ग्रामपंचायत येथील रहीवाशी नसावा.), नगर पालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परीसरात असलेल्या महाविद्यालय/शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी सुध्दा  या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील, विद्यार्थी 11 वी, ‍12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा,   12 वी मध्ये विद्यार्थ्यांस किमान 50 टक्के गुण असल्यावर या योजनेचा पुढे पदवी/पदव्युत्तर शिक्षणासाठी         लाभ घेता येईल,  या योजनेचा पुढे लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस अभ्यासक्रमाचे मागील प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान 50% गुण किंवा   त्याप्रमाणात ग्रेडेशन /CGPA असणे आवश्यक राहील, विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या मान्यता प्राप्त अभ्यासक्रमाचा कालावधी  2 वर्षापेक्षा कमी नसावा,  विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल, या योजनेमध्ये दिव्यांग (अनु.जाती व नवबौध्द घटकातील )विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. त्यांना गुणवत्तेचे  टक्केवारी 40% इतकी राहील, या योजनेसाठी खास बाब सवलत लागु राहणार नाही.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (साक्षांकीत प्रती)- जातीचा दाखला,महाराष्ट्राचा रहीवाशी असल्याचा पुरावा, आधार कार्डची सत्यप्रत, बँक पसबूक सत्यप्रत, उत्पनाचे  प्रमाणपत्र 2.50 लाखाच्या आत./ फॉर्म नंबर 16,विद्यार्थी दिव्यांग अल्याबाबतचे प्रमाणपत्र, इयत्ता 10 वी, 11 वी, 12 वी, व पदवी परीक्षेचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे बोनाफाईट सर्टीफीकेट,विद्यार्थीनी विवाहीत असल्यास पतीचा उत्पनाचा पुरावा, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा,विद्यार्थ्यांने कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र,विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा.(खाजगी वसतीगृह, भाडे करारनामा इ.), महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत.
 या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी  ज्या जिल्हयामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समजा कल्याण यांचेकेडे त्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा, विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थीती किमान 75 टक्के आवश्यक राहील. याबाबत संबधीत संस्थेचे प्रत्येक सहामाहीतील उपस्थीती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देवून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणीक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नौकरी व व्यावसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12% व्याजासह वसूली केली जाईल असे सहायक आयुक्त समाज कल्याण भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.
000000

No comments: