02 August, 2017

माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना
हिंगोली, दि. 2 : जिल्ह्यातील माजी सैनिक / विधवा यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये इयत्ता दहावी व बारावी तसेच पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये 60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व पुढील शिक्षण घेत आहेत अशा माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्यांना गुणांनुक्रमे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
तरी ज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्षे 2016-17 मध्ये इयत्ता दहावी व बारावी तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये 60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व पुढील शिक्षण घेत आहेत त्यांनी शिष्यवृत्ती मिळणेबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कक्ष हिंगोली येथे उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त माजी सैनिक / विधवा यांनी पात्र पाल्याचे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

No comments: