24 August, 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत
शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून अर्ज भरण्याचे आवाहन
-- जिल्हाधिकारी अनिल भंडारी

            हिंगोली, दि. 24: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र आणि सी. एस. सी. सेवा केंद्रावर ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे.
राज्य शासनाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी ग्रामपंचायतींच्या ठिकाणी 378 ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ( ASSK) ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. तसेच सदर ( ASSK) केंद्रामधील 200 केंद्रावर बायोमॅट्रीक मशिन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. 
            जिल्ह्यात आतापर्यंन्त एकूण 32 हजार 131 शेतकऱ्यांची आपले सरकार या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच यापैकी एकूण 27 हजार 134 अर्ज आपले सरकार या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेले आहेत.
            तसेच दिनांक 23 ऑगस्ट, 2017 पासून भरलेल्या अर्जात दुरुस्ती ( Edit Mode) करण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत देण्यात आलेली आहे. मयत व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना कर्जमाफीचा अर्ज भरता येईल.
            जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र आणि सी. एस. सी. केंद्रास भेट देवून ऑनलाईन अर्ज सादर करावेत. जेणेकरुन शेवटच्या दिवसांमध्ये अर्ज भरण्यामध्ये गर्दी होणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे.

*****

No comments: