30 January, 2018

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2017 साठी प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी



वृत्त क्र.46                                           दिनांक : 30 जानेवारी 2018
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2017 साठी
प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी
हिंगोली, दि.30:- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2018 असा आहे.
            स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा  www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.  तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन , जिल्हा माहिती अधिकारी श्री. अरुण सुर्यवंशी यांनी केले आहे.
0000

No comments: