29 April, 2019

पाणीपट्टीची रक्कम न भरल्याने इसापूर धरणातून पाणीपूरवठा बंद


पाणीपट्टीची रक्कम न भरल्याने इसापूर धरणातून पाणीपूरवठा बंद

        हिंगोली,दि.29: उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) यामध्ये वर्ष 2018-19 करिता जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्याकडून टंचाई कालावधीकरिता जिल्हा परिषद, हिंगोली तर्फे ग्रामीण पाणी पुरवठ्या करिता 12.00 द.ल.घ.मी. पाणी आरक्षित करण्यात आले आहे.
            दरवर्षी या विभागातर्फे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बिगर सिंचन पाणी सोडण्यात येते, तथापि आरक्षित करण्यात आलेल्या पाण्याची पाणीपट्टी जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयाकडून पूर्णपणे भरणा केली जात नाही. जून 2018 अखेर जिल्हा परिषद, हिंगोली यांचेकडे रु.278.696 लक्ष व वर्ष 2018-19 करिता आरक्षित पाण्याची 50 %  अग्रीम पाणीपट्टी रु. 21.60 लक्ष अशी एकूण रु. 300.296 लक्ष पाणीपट्टी थकीत आहे. यापैकी फक्त रु. 3.00 लक्ष पाणीपट्टी भरणा करण्यात आलेली आहे. शासन निर्णयान्वये आरक्षित पाण्याची अग्रीम पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे भरणे आवश्यक असतानाही संबंधित कार्यालयाने थकीत व अग्रीम पाणीपट्टीची रक्कम भरणा न केल्यामुळे यापुढे या कार्यालयाकडून पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग, नांदेड यांनी कळविले आहे.
****


No comments: