महाराष्ट्र राज्याची विविध क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती
पालकमंत्री
दिलीप कांबळे
हिंगोली,दि.01: महाराष्ट्र राज्याची 1 मे, 1960 रोजी स्थापना
झाली. तेव्हा पासूनच राज्याने शिक्षण, आरोग्य, सहकार, कृषी अशा विविध क्षेत्रात
अभूतपूर्व प्रगती केली असून, त्यामुळेच आज आपले राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जात असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व
वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
दिलीप कांबळे यांनी केले.
यावेळी पालकमंत्री कांबळे म्हणाले की, देशाच्या विकासात आपल्या
महाराष्ट्र राज्याचा खुप महत्वाचा मोठा वाटा आहे. 1 मे, 1999 रोजी निर्माण झालेल्या आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या
स्थापनेचा आज वर्धापन दिन आहे. विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक,
आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे, ही आनंदाची बाब असून,
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरीता शासन कटीबध्द आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान
महत्वाचे असून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास
जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होईल. त्याकरीता समन्वय आणि सहकार्याची
भावना ठेवत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्व जण एकजुटीने
प्रयत्न करु यात असे आवाहन ही श्री. कांबळे यांनी यावेळी केले. तसेच जगात आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन ही साजरा होत असून, देशाला प्रगतीपथावर
आणण्यामध्ये कामगार बांधवांचा खुप महत्वाचा वाटा असल्याचे सांगुन श्री कांबळे
यांनी कामगार बंधुना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमांचे सुत्र संचलन मदन मार्डीकर यांनी केले. यावेळी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,
पत्रकार, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या
संख्येने उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment