01 December, 2020

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रांगेत उभे राहून बजावला मतदानाचा हक्क

 


         हिंगोली,दि. 01 : आज 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावत अधिकाधिक पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर भेट देवून मतदान केंद्राची पाहणी केली. जिल्ह्यात 39 मतदान केंद्रे असून या सर्व मतदान केंद्रावर सकाळी 8.00 वाजेपासून सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडत आहे. कोविड-19 च्या अनुषंगाने मतदानाला येणाऱ्या सर्व मतदाराची थर्मल गन व ऑक्सिमीटरद्वारे ताप व ऑक्सिजनची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती यावेळी दिली.

तसेच या सर्व मतदान केंद्रावर सॅनिटायझरचाही वापर करण्यात येत आहे. मतदानासाठी रांगेत येणाऱ्या मतदारांमध्ये सामाजिक अंतराचे तंतोतत पालन करण्यात येत असून अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी केले.

 

****

No comments: