17 December, 2020

निवडणूक कालावधीत सार्वजनिक, खाजगी व्यक्तींच्या जागेवर झेंडे , भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध

 


 

 हिंगोली, दि. 17 : राज्य निवडणूक आयोगाने दि. 11 डिसेंबर, 2020 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020 घोषित केला असून, कार्यक्रम घोषित केल्‍याच्‍या दिनांकापासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी काठ्यावर झेंडा लावून उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादी करीता कोणत्याही व्यक्तींची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकाची परवानगी शिवाय व संबंधित परवाना प्राधिकारणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास प्रतिबंध घालणे आवश्‍यक असल्‍याने व प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश पोलीसांनी ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करुन त्यास प्रसिध्दी देण्याचे ओदश सर्व संबंधितास नोटीस देवून त्‍यांचे म्‍हणणे ऐकून घेणे सद्य:स्थितीत शक्‍य नसल्‍याने  निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 18 जानेवारी, 2021 पर्यंत प्र.जिल्‍हादंडाधिकारी शंकर बरगे यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये त्यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

हे आदेश दि. 18 जानेवारी, 2021 रोजीच्या 23.00 वाजेपर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लागू राहतील, असे प्र.जिल्हादंडाधिकारी शंकर बरगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

No comments: