19 June, 2018

बालकल्याण समितीची स्थापना

बालकल्याण समितीची स्थापना
        हिंगोली, दि. 19:-  बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015 ची अंमलबजावणी  करण्यात येते . या अधिनियमातील कलम 29(1) नुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या  बालकांच्या प्रकरणी  त्यांच्या पुनर्वसन व सामाजिक पुन:स्थापनासाठी  निर्णय घेण्याचे  अधिकार  अधिनियमातील कलम 27(1) नुसार स्थापन करण्यात  आलेल्या बाल  कल्याण समितीस आहेत. त्यामुळे  काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक समिती समोर सादर होऊन  त्या बालकास  अधिनियमाच्या कलम 50 (1) अन्वये  स्थापन करण्यात  आलेल्या  बालगृहात  दाखल करण्याचे अधिकार बाल कल्याण समितीस आहेत व कलम 27(8) नुसार मा.जिल्हाधिकारी  तथा जिल्हा  न्यायदंडाधिकारी  यांना बाल कल्याण समितीचा  त्रैमासिक  आढावा घेण्याचे अधिकार आहेत. हिंगोली जिल्ह्यात  बाल न्याय  (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015 नुसार नवीन बाल कल्याण  समिती नियुक्त झाली  असून सदर च्या  नवनियुक्त  बाल कल्याण  समितीची प्रथम बैठक  दिनांक 8 जून 2018 रोजी सायं. 5.00 वाजता जिल्हाधिकारी , हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
            हिंगोली जिल्ह्याच्या नवनियुक्त बाल कल्याण समितीचे अध्यक्ष श्री. अभय कुमार भरतीया (मो. 7020430520) व इतर 3 सदस्य  पुढीलप्रमाणे आहेत- श्रीमती जया  करडेकर (मो.9850076835) श्री. संभाजी माने (मो.9822991143) आणि श्री. विक्रम जावळे (मो.9850377020)  हे आहेत. बाल कल्याण समितीचे कामकाज आदर्श कॉलेज  जवळ , सावरकर नगर , हिंगोली येथून चालते . अनाथ , काळजी व संरक्षणाची गरज  असलेल्या मुलांबाबत  आवश्यक  असल्यास बालकल्याण समितीस वरील पत्यावर संपर्क साधावा असे आवाहन  जिल्हा महिला व बालविकास  अधिकारी श्री. शिंदे यांनी केले आहे.
000000

No comments: